शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अक्कलपाडातून नकाणेत पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 22:26 IST

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना : मंगळवारपासून दररोज ५ दलघफू पाणी आणणार

ठळक मुद्देशहरात ४६३ पैकी २०३ हातपंप, ३५ जेटपंपांपैकी १५ जेटपंप सुरू असून त्यावरही मनपाकडून भर दिला जाणार आहे़सद्यस्थितीत नकाणे तलावात ६ दलघफू जलसाठा उपलब्ध आहे़ मनपाकडून दररोज २ दलघफू पाणी नकाणे तलावातून उचलले जाते़ शहर पाणीपुरवठ्याबाबत महापौर, आयुक्त देखील सातत्याने आढावा बैठका घेत आहेत़या भागात टंचाईची शक्यता नकाणे तलावावरून कुमार नगर, सिमेंट जलकुंभ, अशोक नगर व राम नगर असे चार जलकुंभ भरले जातात़ त्यावरून संपूर्ण मोगलाई भाग, पेठ भाग (गल्ली क्रमांक एक ते सात), ८० फुटी रोड, ४० गाव रोड, राजकमल टॉकीजच्या मागील परिसर, जुने धुळे परिसरातील नि

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नकाणे तलावातील जलसाठा घटल्याने ४० टक्के शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले असतांनाच मनपा व पाटबंधारे विभागाने अखेर पाणीप्रश्नावर तात्पुरती मात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़ साक्री तालुक्यातील धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात काहीशी भर पडली आहे़  त्यामुळे मंगळवारपासून दररोज ५ दलघफू पाणी अक्कलपाडा प्रकल्पातून हरण्यामाळव्दारे नकाणे तलावात आणले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली़शहरावर ऐन पावसाळयात पाणी प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ एकिकडे तापीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतांना दुसरीकडे नकाणे तलावात केवळ ६ दलघफू जलसाठा उरला आहे़ त्यामुळे शहरात निर्माण होणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनपातर्फे उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ दरम्यान, पाटबंधारे विभागाने देखील शहराला पाणीपुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी आणण्याची तयारी केली आहे़गेल्या काही दिवसांत साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे़ त्यामुळे लाटीपाडा धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले असल्याने अक्कलपाडा प्रकल्पात मृतसाठ्यात वाढ होत आहे़ सध्या २५० दलघफू साठा अक्कलपाडा प्रकल्पात असून त्यातून दररोज ५ दलघफू जलसाठा हरण्यामाळ तलावात एक्सप्रेस कॅनॉल व्दारे आणले जाणार आहे़ हरण्यामाळ मधून नकाणे तलावात पाणी आणले जाईल, त्यामुळे पाण्याचा निर्माण होणारा प्रश्न तात्पुरता सुटू शकतो़ शहरात महापालिका मालकीच्या सात विहीरी आहेत़ अहिल्यादेवी नगर, अण्णासाहेब पाटील नगर, सोन्या मारूती कॉलनी, सिध्दार्थ नगर, नवजीवन नगर, शनि नगर व जमनागिरी भिलाटी याठिकाणी विहीरी आहेत़  त्याठिकाणी तात्पुरते पंप बसवून परिसरातील नागरिकांना वापरासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते़