शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाडातून नकाणेत पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 22:26 IST

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना : मंगळवारपासून दररोज ५ दलघफू पाणी आणणार

ठळक मुद्देशहरात ४६३ पैकी २०३ हातपंप, ३५ जेटपंपांपैकी १५ जेटपंप सुरू असून त्यावरही मनपाकडून भर दिला जाणार आहे़सद्यस्थितीत नकाणे तलावात ६ दलघफू जलसाठा उपलब्ध आहे़ मनपाकडून दररोज २ दलघफू पाणी नकाणे तलावातून उचलले जाते़ शहर पाणीपुरवठ्याबाबत महापौर, आयुक्त देखील सातत्याने आढावा बैठका घेत आहेत़या भागात टंचाईची शक्यता नकाणे तलावावरून कुमार नगर, सिमेंट जलकुंभ, अशोक नगर व राम नगर असे चार जलकुंभ भरले जातात़ त्यावरून संपूर्ण मोगलाई भाग, पेठ भाग (गल्ली क्रमांक एक ते सात), ८० फुटी रोड, ४० गाव रोड, राजकमल टॉकीजच्या मागील परिसर, जुने धुळे परिसरातील नि

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नकाणे तलावातील जलसाठा घटल्याने ४० टक्के शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले असतांनाच मनपा व पाटबंधारे विभागाने अखेर पाणीप्रश्नावर तात्पुरती मात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़ साक्री तालुक्यातील धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात काहीशी भर पडली आहे़  त्यामुळे मंगळवारपासून दररोज ५ दलघफू पाणी अक्कलपाडा प्रकल्पातून हरण्यामाळव्दारे नकाणे तलावात आणले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली़शहरावर ऐन पावसाळयात पाणी प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ एकिकडे तापीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतांना दुसरीकडे नकाणे तलावात केवळ ६ दलघफू जलसाठा उरला आहे़ त्यामुळे शहरात निर्माण होणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनपातर्फे उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ दरम्यान, पाटबंधारे विभागाने देखील शहराला पाणीपुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी आणण्याची तयारी केली आहे़गेल्या काही दिवसांत साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे़ त्यामुळे लाटीपाडा धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले असल्याने अक्कलपाडा प्रकल्पात मृतसाठ्यात वाढ होत आहे़ सध्या २५० दलघफू साठा अक्कलपाडा प्रकल्पात असून त्यातून दररोज ५ दलघफू जलसाठा हरण्यामाळ तलावात एक्सप्रेस कॅनॉल व्दारे आणले जाणार आहे़ हरण्यामाळ मधून नकाणे तलावात पाणी आणले जाईल, त्यामुळे पाण्याचा निर्माण होणारा प्रश्न तात्पुरता सुटू शकतो़ शहरात महापालिका मालकीच्या सात विहीरी आहेत़ अहिल्यादेवी नगर, अण्णासाहेब पाटील नगर, सोन्या मारूती कॉलनी, सिध्दार्थ नगर, नवजीवन नगर, शनि नगर व जमनागिरी भिलाटी याठिकाणी विहीरी आहेत़  त्याठिकाणी तात्पुरते पंप बसवून परिसरातील नागरिकांना वापरासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते़