शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासंदर्भात नगरपंचायतीला गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:46 IST

साक्री : भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन, शहराला पाणीही पुरेसे मिळत नसल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण असतांना नगरपंचायतीला गांभीर्य नाही. नगरपंचायत प्रशासनाने शहरवासीयांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप भाजपने तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत प्रशासनाने कोरोना काळात फवारणी यंत्र विकत घेतले आहे. त्यासाठी निधीचा खर्चही केला. परंतु या यंत्राचा उपयोग फवारणी करताना कुठेच दिसून आला नाही. जुने गाव परिसरात कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे पोळा चौक, राणा प्रताप चौक, वंजार गल्ली, चांद तारा मोहल्ला, कासार गल्ली, सुतार गल्ली, गवळीवाडा, बाजारपेठ, सराफ बाजार आदी परिसरांमध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. या परिसरात दररोज फवारणी करून परिसर निजंर्तुकीकरण करणे गरजेचे आहे. परंतु नगरपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जुने गाव परिसरासह शहरातील सर्वच कॉलनी परिसरात फवारणी करून निजंर्तुकीकरण करण्यात यावे. कंटेनमेंट क्षेत्र व व बफर झोन यातील नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाचे आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी तथा तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करण्यात येत नाही. शहरात अस्वच्छतावाढली आहे.कोरोना काळात नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. जलशुद्धीकरण केंद्र नावालाच उरले आहे. शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला. निवेदन देतेवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, उत्पल नांद्रे, शैलेंद्र आजगे, कल्याण भोसले, योगेश भामरे, दयानंद मराठे, दिनेश नवरे,दीपक वाघ आदी उपस्थित होते.