शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडीकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST

राज्यात २५ लाख युवा वॉरिअर्स भारतीय जनता युवा माेर्चाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी व कोविडकाळात राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर २५ ...

राज्यात २५ लाख युवा वॉरिअर्स

भारतीय जनता युवा माेर्चाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी व कोविडकाळात राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर २५ युवा वाॅरिअर्स आणि हेल्थ वॉरअर्सची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी सोमवार ते साेमवार असे आठ दिवस राज्यभरात दौर काढून युवकांचे संकट वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.

महागाईला राज्य सरकार जबाबदार

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून पेट्रोल, डिझेलसह गॅस व जीवनाश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. वास्तविक पेट्रोल, डिझेल व गॅस वाढीला राज्य सरकार जबाबदार असताना राज्य सरकार केंद्र सरकारवर ठपका ठेवत आहे. केंद्र सरकार पेट्रोलसाठी २० टक्के टॅक्स लावते तर राज्य सरकार पेट्रोल दरामागे ४० टक्के जनतेकडून घेते. राज्य सरकारकडून पेट्रोल, डिझेलमधील २० टक्के, तर गॅसमागे २०० रुपये कमी केल्यास नागरिकांचा आर्थिक भुर्दंड कमी होऊ शकतो.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे नियोजन भाजपकडून

राज्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जनतेची गैरसाेय होऊ नये, अडचणीच्या काळात मदत व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर २५ युवा वॉरिअर्स आणि एक हेल्थ वॉरिअरची नियुक्ती केली जाणार आहे. यात हा हेल्थ वॉरिअर मतदान केंद्राच्या कक्षेतील प्रत्येक घरावर लक्ष ठेवेल. यासाठी राज्यातील अशा सर्व मतदान केंद्रांवर ९७ हजार ६४६ हेल्थ वॉरिअर आणि २५ लाख युवा वॉरिअर्स भाजयुमोच्या अभियानांतर्गत नियुक्त करण्यात येत आहेत.

नाशिक जिल्ह्यात २२ शाखांचे उद्घाटन केले. यात प्रत्येक शाखेतून २५ युवकांचे गट स्थापन केले. विशेष म्हणजे सटाणा शहरातील मुस्लीम वसाहतीतील २५ युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा वॉरिअर्स म्हणून नोंदणी केली. यात सर्व समाज, सर्व धर्मांना सोबत घेत युवा वॉरिअर्स तयार करण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

जिथे भ्रष्टाचाराला वाव, त्याच योजना सुरू

मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, शेतकऱ्यांना भेटत नाहीत, शेतमजुरांचे प्रश्न समजून घेत नाहीत, पीकविमा योजना बंद, पीककर्ज योजना बंद आहे. संजय गांधी निराधार योजना, रोजगार हमी योजना बंद आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस नसल्याने दुष्काळी स्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी कोणत्याच योजना राबविल्या जात नाहीत. यावर सरकारमधील कोणीच काही बोलत नाही. मात्र, राजकारणावर बोलताना हे तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. राज्यातील १२ कोटी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. फडणवीस सरकारच्या काळात आपण ऊर्जामंत्री असताना पाच वर्षांत ४५ लाख शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी वीज दिली. २८ हजार कोटींची वीजबिले थकली तरी एकाही शेतकऱ्याच्या कृषिपंपाची वीज खंडित केली नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारने ऐन रब्बी, खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला. केंद्राच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून राज्यातील ग्रामपंचायतींना पथदिव्यांची वीजबिले भरण्याची सक्ती केली जात आहे, असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.