शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाखोंची उलाढाल ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:09 IST

उत्पन्नावरही पाणी : व्यापा-यांनी धान्यखरेदी बंद केल्याचा परिणाम

ठळक मुद्देसोमवारपासून व्यापा-यांनी केली धान्यखरेदी बंद ऐन हंगामात शेतकरी अडचणीत लवकरात लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा 

लोकमत आॅनलाईनधुळे : सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दरात धान्य खरेदी करणा-या व्यापा-यांना शिक्षेच्या तरतुदीच्या निषेधार्थ व्यापा-यांनी चार दिवसांपासून धान्यखरेदीच बंद केली आहे. परिणामी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे बाजार समित्यांना मिळणा-या उत्पन्नावरही पाणी फेरले जात आहे. या प्रश्नी तोडग्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, दोंडाईचा, साक्री व शिंदखेडा अशा पाच बाजार समित्या आहेत. सरकारच्या अन्याय धोरणाच्या निषेधार्थ व्यापा-यांनी शेतक-यांनी आणलेल्या शेतमालाची खरेदी बंद केली आहे. परिणामी बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. पावसाळा हा तसा धान्य खरेदी-विक्रीसाठी मंदीचा काळ समजला जातो. तरी येथील बाजार समितीत या दिवसांत रोज २५० ते ३०० क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री होते. त्यामुळे ५ ते ६ लाखांची उलाढाल होते. कमी-अधिक फरकाने सर्व बाजार समित्यांमध्ये हीच स्थिती आहे. त्यामुळे चार दिवसांपासून रोज सुमारे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. खरेदी-विक्री होणा-या शेतमालाच्या किंमतीवर शेकडा १ रुपये अशी बाजार फी आकारली जाते. त्यामुळे दिवसाकाठी या दिवसांतही बाजार समितीला कमिशनपोटी ५ ते ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु चार दिवसांपासून त्यावरही पाणी फेरले गेले आहे. यामुळे या प्रश्नी सरकारने लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :Dhuleधुळे