शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारपेठेत लाखोंची आर्थिक उलाढाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 11:19 IST

दर आवाक्यात : सोन्यासह वाहन खरेदीची रेलचेल, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा झाला गोड 

ठळक मुद्देdhule

धुळे / शिरपूर :अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिरपूर बाजारपेठेत आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ सध्या दरातही चांगलीच घसरण झाल्याने ग्राहकांमधून आंब्यांच्या मागणीत वाढ झाली आहे़ हापूस ५०० रुपये डझनावरून ३५० रुपयांवर आले असून केशर १००-१२० तर बदाम ८०-१०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे़ तसेच सराफ बाजारातही साडे तीन मुहूर्तावर नागरिकांनी सोने - चांदीच्या दागिन्यांची खरेदी केल्याने बाजारात एका दिवसात लाखोंची आर्थिक उलाढाल झाली आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून आंबा विक्रीस दाखल झाला आहे़ आंध्रप्रदेश व गुजराथ राज्यातून जिल्ह्यात आंब्याची आवक होत आहे. शिरपूरला सुरुवातीला आंब्याच्या पेटीचा दर दीड ते दोन हजाराच्या घरात होता़ एका पेटीत चार डझन आंबे असतात. आंबा बाजारात २०० ते २५० रुपये किलोप्रमाणे विकला जात होता. हे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याने ग्राहकांनी आंबे खरेदीकडे पाठ फिरविली होती़मात्र अक्षय तृतीयेच्या आदल्यादिवशी सोमवारी  आठवडे बाजारात तब्बल ४० ते ४५ टन आंब्याची आवक झाली. बोहरून आलेल्या आंब्यांमध्ये केशर, बदाम, लंगडा, दशेरी हे प्रकार होते.  सरासरी ७० ते १२० रुपये प्रति किलो आंबा विकला गेला.  दर उतरल्याने बाजारपेठेत आंबे खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.  

 सोनेखरेदीसह वाहन विक्री  अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदीची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली़ लग्नसराई व अक्षय तृतीयेचे औचीत्य साधत सोन्याची खरेदी करण्यात आली  मात्र दुसरीकडे मुहूर्तावर दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी बुकिंगचे प्रमाण   गेल्यावेळेप्रमाणेच आहे. काही अंशी त्यात वाढ झाली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या आठ दिवसापासून नागरिकांनी आपले वाहन बुकींग केले होते़ मंगळवारी मुहूर्त साधत वाहन घरी नेले होते़ साधारणपणे तीनेश ते चारशे वाहनांची विक्री झाल्याची माहिती वाहन विक्रेत्याकडून देण्यात आली होती़ 

इलेक्ट्रॉनिक वस्तू्ंना  पसंतीसोने बाजारात साधारणपणे दोन कोटी रुपयापर्यंत आर्थिक  उलाढाल झाल्याचे जाणकारांचे मत आहे. याशिवाय  कापड, इलेक्ट्रॉॅनिक वस्तूंचीही या मुहूर्तावर खरेदी झाली. इलेक्ट्रॉनिक वस्तू्ंमध्ये एलईडी टीव्ही, वॉशिग मशीन, एअर कंडीशनर, फ्रीज या वस्तूंची खरेदी करण्यात आली. याप्रकारे एकूण बाजारपेठेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साधारणपणे दहा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे़ 

घागर विक्रीही मोठ्याप्रमाणावरअक्षय तृतीयेनिमित्त प्रत्येक घागर भरण्याची प्रथा आहे. त्यानुसार शहरातील साक्री रोड, जुना आग्रारोड, दत्त मंदिर परिसर, नेहरू नगर पाण्याची टाकीजवळ व अग्रवाल नगर परिसरातील विक्रेत्यांनी घागर विक्रीसाठी ठेवल्या होत्या.  ५० ते ७० रुपये याप्रमाणे घागर विक्री  झाली.  

आंब्यांच्या दरात वाढअक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळी व आंब्याचा रसाचा नैवेद्य हा दाखविण्यात येत असल्याने मंगळवारी पाचकंदील, जुना आग्रारोड, नेहरू चौक व दत्त मंदिर परिसरातील आंबे विक्रेत्यांकडे आंबे खरेदीसाठी गर्दी झाली होती. केसर, बदाम या प्रकारातील आंब्याला नागरिकांकडून विशेष मागणी होती. १२० ते १४० रुपये किलो या दराने आंब्याची विक्री केली जात होती. आंब्याच्या दरात तेजी असतानाही नागरिकांनी खरेदीला प्राधान्य दिल्याचे चित्र मंगळवारी बाजारपेठेत दिसून  आले. अनेकांनी या सणाचे औचित्य साधून दुचाकी व चार चाकी गाड्यांची नोंदणी करून ठेवली होती. 

लग्नसराई वगळता गेली कित्येक महिने सुवर्णपेढीत सोने खरेदीसाठी ग्राहकांचा कल कमी झाला आहे़ परंतु खरेदी दरात काही प्रमाणात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे़ गेल्या महिन्यात सोने प्रति तोळा ३२ हजार ५०० रुपयांवर गेला होता़ या दरात थोडी घसरण झाली असून सध्या बाजारपेठेत सोन्याचा एक तोळ्याचा दर ३० हजार रुपये इतका आहे़ चांदीची घसरण झाली़ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने व चांदीचे दर स्थिर असल्याने सुवर्णपेढीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे