शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

कोरोनाच्या वाढत्या विषाणू संसर्गाने आता रौद्ररूप धारण केलेले आहे. दररोज तीनशेच्या पुढेच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने, प्रशासनाकडून सुरक्षेच्या ...

कोरोनाच्या वाढत्या विषाणू संसर्गाने आता रौद्ररूप धारण केलेले आहे. दररोज तीनशेच्या पुढेच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने, प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरू झालेले आहे. अशातच काहींनी मात्र भीतिपोटी मोलकरणींसाठी काही दिवसांपुरते दरवाजे बंद केले आहेत.

घराघरात कुणी भांडी धुण्याचे काम, तसेच स्वयंपाकाचे काम करून काही मोलकरीण महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. मात्र, कोरोनामुळे आता त्यांच्यावरही संकट निर्माण झालेले आहे.

अशा संकटाच्या काळात काहींनी मोलकरणींना सुट्टी दिल्याने, त्यांना काम शोधण्याची वेळ आलेली आहे.

एका घरी काम करून साधरणत: हजार ते बाराशे रुपये मिळतात. एक मोलकरीण साधारणत: चार-पाच घरी काम करीत असते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याने, काही घरांनी तूर्त काम बंद केले आहे. त्यामुळे आता घरी बसून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.

एका घरातून मिळतात ५०० ते ७०० रुपये

धुळे शहरात मोलकरणींची संघटना नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक घरातून ठरावीक रक्कम मिळेल असे नाही. जसे घर व कामाचे स्वरूप असेल, त्यानुसार त्यांना पैसे मिळत असतात. मात्र, धुणीसाठी ५०० व भांडी घासण्यासाठी ५०० रुपये महिना घेतला जातो. फरशी पुसायची असल्यास त्याचेही वेगळे पैसे लागतात. एक मोलकरीण महिला पाच-सहा घरी काम करीत असते.

गेल्या चार वर्षांपासून मी घरोघरी धुणी भांडीचे काम करते. त्यातून चांगला रोजगार मिळत होता. मात्र, आता लॉकडाऊनमुळे काहीं घरांचे काम बंद झाले असून, मोजकेच घरे बाकी आहे. त्यामुळे आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे

वंदना इंगळे

मागील वर्षीही लॉकडाऊन असल्याने, अनेक घरांमधील काम बंद झाले होते. परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर लोकांकडील घरकाम सुरू झाले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन लागल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

कमला सोनवणे

सुरुवातीला पाच-सहा घरी काम करता यायचे. त्यामुळे चांगले पैसे मिळायचे. आता लॅाकडाऊनमुळे अडचण आलेली आहे. त्यामुळे काही घरांनी तूर्त काम बंद केले आहे.

रंजना पाटील

घर कसे चालवायचे?

काही महिन्यांपासून महागाई गगनाला भिडलेली आहे. त्यातच आता कामाचे संकट निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीत घर कसे चालवायचे, हा प्रश्नच आहे. त्यामुळे शासनाने आम्हालाही मदत करावी.