शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शोषणमुक्तीच्या चळवळीत दलित-आदिवासी साहित्याचे मोठे योगदान : काॅ. नजुबाई गावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST

धुळे : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते विद्रोही कवी जितेंद्र अहिरे यांच्या "आम्ही हिशोब घेवू" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जागतिक दर्जाच्या ...

धुळे : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते विद्रोही कवी जितेंद्र अहिरे यांच्या "आम्ही हिशोब घेवू" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जागतिक दर्जाच्या आदिवासी कादंबरीकार सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉ. नजुबाई गावित यांच्या हस्ते झाले.

धुळे येथे पत्रकार भवनात शनिवारी सकाळी झालेल्या या प्रकाशन साेहळ्याला सत्यशोधक जन आंदोलनाचे सचिव कॉ. सिद्धार्थ जगदेव, कॉ. दत्ता थोरात, विद्रोही कवी राजीव हाके , सचिन बागुल यांची प्रमुख उपस्थितीत होती.

कॉ. नजुबाई गावित यांनी विमोचनपर भाषणात महाराष्ट्रातील दलित साहित्य, आदिवासी साहित्य याबाबत भाष्य करीत व्यवस्थेला नकार देणाऱ्या दलित साहित्याने भारतीय दलित पँथर सारख्या चळवळीला जन्मास घातले असल्याचं नमूद केलं. दलित साहित्यिकांनंतर आदिवासी साहित्यिक प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारू लागले. निव्वळ जाब विचारून थांबले नाहीत तर शोषणमुक्तीच्या चळवळी उभ्या करण्यासाठी प्रयत्नरत राहिले. महाराष्ट्रात कॉ. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दलित आदिवासी ग्रामीण साहित्य महासभेचा यशस्वी प्रयोग करून अब्राह्मणी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा मुद्दा साहित्यिक चळवळीच्या अजेंड्यावर आणला.

कॉ. नजुबाई भाषणात पुढे म्हणाल्या की, कवी जितेंद्र अहिरे यांची कविता प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न करते आणि कार्यकर्त्याला कृतीप्रवण बनण्यास भाग पाडते. आत्मचिकीत्सा करायला लावते.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विद्रोही कवी राजीव हाके यांनी कविता संग्रहातील संस्कृती, एल्गार, चळवळीतील मुली या कवितेंचा संदर्भ घेवून समकालीन कवितेपेक्षा जितेंद्रची कविता सर्वार्थाने वेगळी असल्याचे विवेचन केले. विद्रोही कवी सचिन बागुल यांनी जितेंद्र ज्या परिस्थितीतून घडला त्याचे प्रतिबिंब त्याच्या कवितेत येतेण निव्वळ परिस्थिती पाहून रडत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करीत चळवळ आणि विचार जागविण्याचा बोध जितेंद्रची कविता देते अशी समपर्क मांडणी केली. कॉ. सिद्धार्थ जगदेव यांनी काव्यसंग्रहाचे विश्लेषण करतांना सांगितले की, जितेंद्रने कवितेचा मुक्तछंद प्रकार निवडून व्यवस्थेवर कोरडे ओढले आहेत. त्यांच्या कवितेतील रूपक संभाजी भगत, शंतनू कांबळे यांच्या कवितेशी साधर्म्य दाखविणारे आहे. आई आणि पाऊस या कवितेतून जितेंद्रने अठराविश्व दारिद्र्य आणि पावसाचे नाजूक नाते अलगदपणे उलगडले आहे. गळणाऱ्या झोपडीत माझ्या पिलांना त्रास होऊ नये यासाठी तळमळणारी आई, या पावसात झोपडी सुरक्षित राहावी म्हणून आशाळभूत नजरेने ढगांकडे बघणा-या आईचे चित्रण चपखलपणे केल्याचे सिद्धार्थ जगदेव यांनी सांगितले.

त्यानंतर कवी जितेंद्र अहिरे यांना प्रा. मोहन मोरे, ज्वाला मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात जितेंद्रच्या कष्टकरी मातेचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोककवी दीपक निकम यांची "तांडा" कविता सादर करून सचिन बागुल यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. महेंद्र वाढे, प्रा. प्रशांत कसवे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. चक्षुपाल बोरसे, भैय्या पारेराव, कवायित्री प्रणाली मराठे, माजी नगरसेविका अॅडण कामिनी पिंपळे, आझाद समाज पार्टीचे राहुल वाघ, लसीकरण अधिकारी रोहिणी जगदेव, पत्रकार रविंद्र नगराळे व शहरातील साहित्यिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाहीर मनोज नगराळे, सिद्धांत बागुल, तुषार सूर्यवंशी, प्रसेनजीत जगदेव, दीपक शिरसाठ, अमोल शिरसाठ, संदीप बोरसे, मनीष दामोदर, स्वाती त्रिभुवन यांनी क्रातीगीते सादर केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेंद्र शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राकेश अहिरे तर आभार शरद वेंदे यांनी मानले.