शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

पथविक्रेत्यांना टाळेबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:21 IST

दोंडाईचा : पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेत आधारकार्डला मोबाईल लिंकिंगचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना टाळेबंदीत पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला असून त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल देण्याची योजना कार्यरत झाली आहे. दोंडाईचा नगरपालिकेने सुद्धा या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. नगरपालिका हद्दीत ५११ पथविक्रेते आहेत. या योजनेसाठी आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न मोबाईल क्रमांक असणे अनिवार्य आहे. परंतू बहुतांश पथविक्रेत्यांच्या आधारकार्डला मोबाईल लिंकिंग नसल्याने या योजनेला अडसर निर्माण झाला आहे.कोरोना टाळेबंदीत छोटे दुकानदार, पथविक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ते अल्प भांडवलावर सर्वसामान्य ग्राहकाला सेवा देतात.परंतू कोरोना काळात त्यांचे भांडवलही संपले आहे. त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या वित्त विभागाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे. या योजनेत ७ टक्के दराने फेरीवाल्यास १० हजार रुपयांचा वित्त पुरवठा केला जाणार आहे.दोंडाईचा नगरपालिकेमार्फत या योजनेसाठी आॅनलाईन सर्व्हे झाला असून शहरात ५११ फेरीवाले आढळून आले आहेत. पथविक्रेत्यास ओळखपत्र आवश्यक असून तो नगरपालिका हद्दीतला असल्याचे शिफारसपत्र आवश्यक आहे. या योजनेसाठी नागरी सुविधा केंद्रात जाऊन आॅनलाईन ५० रुपयांचा फॉर्म भरावा लागेल.तो फेरीवाला नगरपालिका हद्दीतील असून त्याचे नाव असल्याचे व्हेरिफिकेशन नगरपालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी करतील. या योजनेसाठी समिती गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष मुख्याधिकारी असतील. परंतू या योजनेसाठी फेरीवाल्याकडे आधार कार्ड व आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंकिंग (संलग्न) असणे आवश्यक आहे.दोंडाईचा नगरपालिका हद्दीत ५११ पथविक्रेते असल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल भावसार यांनी सांगितले. परंतू ५११ पथविक्रेत्यांपैकी बहुतांश पथविक्रेत्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंकिंग नाही. यामुळे पथविक्रेत्यांची मोठी अडचण झाली आहे. सद्यस्थितीत दोंडाईचात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आधारकेंद्र बंद आहेत. त्यामुळे लिकिंगला अडचणी येत आहेत.ही योजना नगरपालिका व बँक अधिकारी यांच्यामार्फत राबविली जात आहे. बँकेमार्फत १० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार असून ७ टक्के व्याज दर आकारला जाणार आहे. वर्षभरात नियमित कर्ज फेडणाऱ्यास आर्थिक सवलत दिली जाणार आहे. परंतू अद्याप दोंडाईच्यातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत कोणत्याही पथविक्रेत्यांनी प्रकरण दाखल केले नसल्याची माहिती बँक व्यवस्थापकाने दिली आहे. निर्धारित वेळेत बँकेत प्रकरण पोहचले नाही तर या योजनेचा फायदा पथविक्रेत्यांना मिळणे मुश्किल आहे.लहान विक्रेत्यांनी, पथविक्रेत्यांनी तात्काळ आॅनलाईन अर्ज दाखल करून पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेऊन पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, प्रभारी मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल भावसार आदींनी केले आहे.