शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

धुळे जिल्ह्यातील ७६ हजार ४१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 11:35 IST

५८ हजार ७११ यांना मिळाला प्रत्यक्ष लाभ, १७ हजार अद्याप वंचित

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ७६ हजार ४१८ शेतकऱ्यांना ४१७ कोटी ३८ लाख ४१ हजार ७०६ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यातील ५८ हजार ७११ शेतकºयांना २४२ कोटी ६१ लाख ४९ हजार ४२८ रुपयांची प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरीत १७ हजार ७०७ शेतकरी अद्याप वंचित असून त्यांना १७४ कोटी ७६ लाख ९२ हजार २७८ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. जिल्हा बॅँकेसह राष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बॅँक मिळून हा लाभ देण्यात आला आहे.या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या १८ याद्या (ग्रीन लिस्ट) धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला प्राप्त झाल्या आहेत. या बॅँकेच्या सभासद असलेल्या ३२ हजार १८५ शेतकºयांना तर राष्टÑीयकृत बॅँकांच्या ४३ हजार ६०८ शेतकरी सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तसेच खाजगी बॅँकांच्या अवघ्या ५१३ व ग्रामीण बॅँकेच्या ११२ लाभार्थ्यांचाही समावेश आहे.जिल्ह्यातील ७६ हजार ४१८ लाभार्थ्यांपैकी ५८ हजार ७११ शेतकºयांना आतापर्यंत प्र्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. त्यात दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत ३४ हजार ९७८ शेतकºयांचे १९० कोटी २६ लाख २१ हजार १६३ रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. एकरकमी परतफेड योजने (ओटीएस) अंतर्गत ३ हजार ६०६ शेतकºयांना १६ कोटी ६९ लाख ५७ हजार ४९६ रुपयांचा लाभ मिळाला. तर ज्या शेतकºयांनी नियमित कर्ज फेड केली आहे, अशा २० हजार १२७ शेतकºयांना प्रोत्साहन स्वरुपात एकूण ३५ कोटी ६५ लाख ७० हजार ७६७ रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.ओटीएस योजनेतील लाभार्थी शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षादरम्यान या योजनेंतर्गत ज्या लाभार्थी शेतकºयांना अद्याप लाभ मिळालेला किंवा देण्यात आलेला नाही, त्यात दीड लाख मर्यादेपर्यंतच्या ९०२ शेतकºयांचा समावेश असून त्यांना २ कोटी ६६ लाख ८१ हजार ५४४ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ओटीएस योजनेंतर्गत समाविष्ट तब्बल १६ हजार १२२ शेतकरी अद्याप संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून त्यांनी दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी त्यापेक्षा जास्त असलेल्या उर्वरीत एकूण १ कोटी ७० लाख ६४ हजार ७११ रुपये एवढ्या रकमेचा भरणा झालेला नाही. त्या साठीची मुदत आॅक्टोबरअखेरपर्यंत वाढविल्याचे सांगण्यात आले. तर नियमित कर्जफेड करणाºया ६८३ शेतकºयांना अद्याप त्यांना मिळणारी १ कोटी ४५ लाख ३९ जार ५९० अद्याप त्यांच्या बॅँकखात्यात जमा झालेली नाही.दरम्यान सर्वच शेतकºयांना वेळेत कर्जमाफीचा लाभ मिळाल्यास त्यांना खरीप, रब्बी पिकांचे नियोजन करणे सोयीस्कर होऊ शकेल. यासाठी संबंधित विभागाने व शेतकºयांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Dhuleधुळे