शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

पाच दिवसांच्या आत पिक कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 21:38 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण करा

धुळे : जिल्ह्यातून पीक कजार्साठी पात्र शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिवांकडे अर्ज सादर करावेत. त्यांनी शेतकºयांचे अर्ज बँकेच्या शाखेत सादर करावेत़ त्यानंतर संबंधित बँकेने पीक कर्ज मंजुरीची प्रक्रिया पाच दिवसांत पूर्ण करून निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली़राज्यस्तरीय बँकर्स समिती मार्फत खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपासाठी धुळे जिल्ह्यातील १९ बँकांना ८३७ कोटी ६६ लाख रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. ३१ जुलैपर्यंत धुळे जिल्ह्यातील बँकांनी ३२ हजार ७९ शेतकºयांना २६२ कोटी ६१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करून ३१.४० टक्के लक्षांक साध्य केला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या एकूण शेतकºयांपैकी १३ हजार ३११ शेतकºयांना ८५ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.धुळे जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बँकाना ५९१ कोटी ७५ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३१ जुलै अखेर १३६ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यातील ११ खासगी बँकाना ९१ कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलै अखेर १८ कोटी ९० लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेस ४ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३१ जुलै अखेर दोन कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १५० कोटी १७ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १०४ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.खरीप पीक कर्ज वितरणाचा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी आढावा घेतला आहे. मागील आठवड्यात कृषी मंत्री दादा भुसे यांनीही पीक कर्ज वितरणाचा आढावा घेवून व्यापक अभियान राबवावे, अशा सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केलेले आहे.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी एकूण ४५ हजार ८२९ शेतकºयांची यादी उपलब्ध झालेली आहे. त्यापैकी ४३ हजार ५४० शेतकºयांनी आधार प्रमाणीकरण केले आहे़ २ हजार २८९ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. संबंधित शेतकºयांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर किंवा बँक शाखेत संपर्क करून १५ आॅगस्ट पूर्वी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.

टॅग्स :Dhuleधुळे