शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

भाजीपाला खरेदीसाठी लातूरचे व्यापारी शेतीबांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:52 IST

ऐन दुष्काळात व भाव नसताना न्याहळोद परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा

ठळक मुद्देऐन दुष्काळात भाजीपाला, दुधाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिललातूरच्या व्यापा-यांकडून खरेदीमुळे वाहतूक खर्चासह मजुरीचा खर्चही वाचलान्याहळोद परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा 

लोकमत आॅनलाईन न्याहळोद, ता.धुळे : ऐन दुष्काळात भाजीपाला व दुधास भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. नुकतेच गावात लातूर येथील व्यापारी कोथिंबीर व  भाजीपाला खरेदीसाठी आले आहेत. ते स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देत असल्याने शेतक-यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.  यावर्षी पाऊस कमी असल्याने जास्त कालावधीचे पीक न घेता लवकर तयार होणा-या भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळले आहेत. यामुळे शेतात भरपूर उत्पादन आल्याने बाजारात भाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत. प्रसंगी शेतमाल शेतातून काढून बाजारात नेण्याचा खर्च देखील निघत नाही. अशा स्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र नेमक्या याच कठीण प्रसंगात लातूर येथील व्यापारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी नुकतीच एक गाडी भरून कोथिंबीर शेतक-यांकडून खरेदी केली. शेतातून भाजीपाला काढणा-या मजुरांचे पैसे देखील हेच व्यापारी देत असल्याने शेतक-यांच्या वाहतूक खर्चासह मजुरीच्या खर्चातही बचत झाली आहे. एरवी बाजारात भाजीपाला नेऊन त्यासाठीचा खर्च निघेल किंवा नाही, याची खात्री नसते. परंतु या व्यवहारात शेतात पीक उभे असतांनाच किती पैसे हातात मिळतील, याची खात्री असल्याने शेतकरी सुखावला आहे. स्थानिक बाजारपेठेत विक्रीत स्पर्धा नसल्याने भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात होता. पण परजिल्ह्याातून आलेल्या व्यापा-यांमुळे भाजीपाला उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी एकजूट दाखवून जास्तीत जास्त भावाने शेतमाल विक्री केला तरच दोन पैसे हातात येतील. दुष्काळी परिस्थितीत लातूरचे व्यापारी आपल्या बांधावर पोहचले, ह्या संधीचे शेतक-यांनी सोने करावे, असे शेतकरी यशवंतराव माधवराव पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती