शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

लाखाचे ‘पाणी’ बाराच्या भावात़ !

By admin | Updated: April 23, 2017 12:43 IST

शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े

ऑनलाईन लोकमत / देवेंद्र पाठक धुळे, दि. 23 - शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े बाभळे जलशुद्धीकरण केंद्र ते नगाव एमबीआर जलकुंभार्पयतच्या जलवाहिनीला 33 ठिकाणी गळती लागली आह़े त्यात काही भागात व्हॉल्व्ह गळती आह़े या सर्व माध्यमातून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आह़े शुक्रवारी ‘लोकमत’ने या जलवाहिनीची पाहणी केली़ 60 टक्के भागाला पुरवठातापी पाणीपुरवठा योजना 29 जुलै 1994 पासून कार्यान्वित झाली आह़े तेव्हापासून शहराच्या 60 टक्के भागाला या योजनेतून पाणीपुरवठा होत आह़े मात्र दिवसेंदिवस ही जलवाहिनी जीर्ण होत असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आह़े आजच्या परिस्थितीत शहरात दररोज सुमारे 5 कोटी 50 लाख लीटर पाणी दाखल होत़े पैकी 1 कोटी 50 लाख लीटर पाणी वाया जात असून त्यापैकी 55 लाख लीटर पाणी केवळ गळतीच्या माध्यमातून वाया जात़े तापी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढत आह़ेपाच वर्षात कोटींवर खर्च दरवर्षी तापी जलवाहिनीला लागणा:या गळतीच्या दुरुस्तीवर सुमारे 10 लाख रुपये खर्च होतात़ गेल्या पाच वर्षात पाणी गळतीवर तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आह़े तापी नदीवरून शहराच्या 60 टक्के भागाला पाणीपुरवठा होत असून जलवाहिनीची लांबी 40 कि.मी. आह़े सर्वाधिक गळती या जलवाहिनीला लागत असून या जलवाहिनीवरून सबलाईन 175 कि.मी. असल्याचे सांगण्यात आल़े तापी पाणीपुरवठा योजनेवरील गळतीमधून रोज लाखो लीटर पाणी वाया जात असून ठिकठिकाणी कारंजे उडताना दिसून आल़े, तर बहुतांश ठिकाणी पाण्याचे मोठे डबके साचल्याचे चित्र स्पष्ट आह़े सरवडजवळ तर महिलांसाठी कपडे धुण्याचे मुख्य ठिकाणच झाले आह़े वाढत्या उन्हामुळे लहान मुले तर अंघोळीचा आनंद लुटत आहेत़ काही गळतींचा आधार नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होत असून कापडणे, देवभाने येथील नागरिक कॅन, ड्रमचा आधार घेत पाणी घेऊन जातात़ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला वर्षभरात  ठिकठिकाणी गळती लागली़ योजना जुनी झाली असून त्यामुळे तिची पाईपलाईन जीर्ण झाल्याने वारंवार गळती लागते, असे मनपा अधिका:यांचे म्हणणे आहे.जीर्ण होतेय जलवाहिनी  1991मध्ये जलवाहिनी टाकल्यानंतर आज 2017 वर्ष सुरू होऊन अर्धे संपत आल़े पण या जलवाहिनीचे नूतनीकरण अद्याप करण्यात आलेले नाही.त्यामुळे ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आह़े ही जलवाहिनी आता बदलण्याची आवश्यकता आह़े पण, महापालिकेचे उदासीन धोरण मात्र या कामाला कधी अनुमती देणार? हा प्रश्न आह़ेलाखो लीटर पाणी मातीमोलजलवाहिनीचे काम झाल्यापासून विचार केल्यास शेकडोवेळा जलवाहिनीला गळती लागली आह़े त्यातून लाखो लीटर पाणी मातीमोल झाले आह़े याशिवाय पाणीचोरीचे प्रमाणही दरम्यानच्या काळात वाढले होत़े यावर प्रतिबंध करण्यासाठी मनपाने उपाययोजनाही केली होती़ 10 लाखांची तरतूद तापी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीला खूपच खर्च लागतो़ दरवेळेस महापालिकेकडे पैसे असतातच, असे नाही़ नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही़ या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने आर्थिक नियोजन करत दरवर्षाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद म्हणून या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 10 लाखांचा खर्च अपेक्षित धरला आह़े