शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

लाखाचे ‘पाणी’ बाराच्या भावात़ !

By admin | Updated: April 23, 2017 12:43 IST

शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े

ऑनलाईन लोकमत / देवेंद्र पाठक धुळे, दि. 23 - शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े बाभळे जलशुद्धीकरण केंद्र ते नगाव एमबीआर जलकुंभार्पयतच्या जलवाहिनीला 33 ठिकाणी गळती लागली आह़े त्यात काही भागात व्हॉल्व्ह गळती आह़े या सर्व माध्यमातून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आह़े शुक्रवारी ‘लोकमत’ने या जलवाहिनीची पाहणी केली़ 60 टक्के भागाला पुरवठातापी पाणीपुरवठा योजना 29 जुलै 1994 पासून कार्यान्वित झाली आह़े तेव्हापासून शहराच्या 60 टक्के भागाला या योजनेतून पाणीपुरवठा होत आह़े मात्र दिवसेंदिवस ही जलवाहिनी जीर्ण होत असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आह़े आजच्या परिस्थितीत शहरात दररोज सुमारे 5 कोटी 50 लाख लीटर पाणी दाखल होत़े पैकी 1 कोटी 50 लाख लीटर पाणी वाया जात असून त्यापैकी 55 लाख लीटर पाणी केवळ गळतीच्या माध्यमातून वाया जात़े तापी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढत आह़ेपाच वर्षात कोटींवर खर्च दरवर्षी तापी जलवाहिनीला लागणा:या गळतीच्या दुरुस्तीवर सुमारे 10 लाख रुपये खर्च होतात़ गेल्या पाच वर्षात पाणी गळतीवर तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आह़े तापी नदीवरून शहराच्या 60 टक्के भागाला पाणीपुरवठा होत असून जलवाहिनीची लांबी 40 कि.मी. आह़े सर्वाधिक गळती या जलवाहिनीला लागत असून या जलवाहिनीवरून सबलाईन 175 कि.मी. असल्याचे सांगण्यात आल़े तापी पाणीपुरवठा योजनेवरील गळतीमधून रोज लाखो लीटर पाणी वाया जात असून ठिकठिकाणी कारंजे उडताना दिसून आल़े, तर बहुतांश ठिकाणी पाण्याचे मोठे डबके साचल्याचे चित्र स्पष्ट आह़े सरवडजवळ तर महिलांसाठी कपडे धुण्याचे मुख्य ठिकाणच झाले आह़े वाढत्या उन्हामुळे लहान मुले तर अंघोळीचा आनंद लुटत आहेत़ काही गळतींचा आधार नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होत असून कापडणे, देवभाने येथील नागरिक कॅन, ड्रमचा आधार घेत पाणी घेऊन जातात़ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला वर्षभरात  ठिकठिकाणी गळती लागली़ योजना जुनी झाली असून त्यामुळे तिची पाईपलाईन जीर्ण झाल्याने वारंवार गळती लागते, असे मनपा अधिका:यांचे म्हणणे आहे.जीर्ण होतेय जलवाहिनी  1991मध्ये जलवाहिनी टाकल्यानंतर आज 2017 वर्ष सुरू होऊन अर्धे संपत आल़े पण या जलवाहिनीचे नूतनीकरण अद्याप करण्यात आलेले नाही.त्यामुळे ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आह़े ही जलवाहिनी आता बदलण्याची आवश्यकता आह़े पण, महापालिकेचे उदासीन धोरण मात्र या कामाला कधी अनुमती देणार? हा प्रश्न आह़ेलाखो लीटर पाणी मातीमोलजलवाहिनीचे काम झाल्यापासून विचार केल्यास शेकडोवेळा जलवाहिनीला गळती लागली आह़े त्यातून लाखो लीटर पाणी मातीमोल झाले आह़े याशिवाय पाणीचोरीचे प्रमाणही दरम्यानच्या काळात वाढले होत़े यावर प्रतिबंध करण्यासाठी मनपाने उपाययोजनाही केली होती़ 10 लाखांची तरतूद तापी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीला खूपच खर्च लागतो़ दरवेळेस महापालिकेकडे पैसे असतातच, असे नाही़ नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही़ या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने आर्थिक नियोजन करत दरवर्षाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद म्हणून या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 10 लाखांचा खर्च अपेक्षित धरला आह़े