शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

लाखाचे ‘पाणी’ बाराच्या भावात़ !

By admin | Updated: April 23, 2017 12:43 IST

शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े

ऑनलाईन लोकमत / देवेंद्र पाठक धुळे, दि. 23 - शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े बाभळे जलशुद्धीकरण केंद्र ते नगाव एमबीआर जलकुंभार्पयतच्या जलवाहिनीला 33 ठिकाणी गळती लागली आह़े त्यात काही भागात व्हॉल्व्ह गळती आह़े या सर्व माध्यमातून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आह़े शुक्रवारी ‘लोकमत’ने या जलवाहिनीची पाहणी केली़ 60 टक्के भागाला पुरवठातापी पाणीपुरवठा योजना 29 जुलै 1994 पासून कार्यान्वित झाली आह़े तेव्हापासून शहराच्या 60 टक्के भागाला या योजनेतून पाणीपुरवठा होत आह़े मात्र दिवसेंदिवस ही जलवाहिनी जीर्ण होत असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आह़े आजच्या परिस्थितीत शहरात दररोज सुमारे 5 कोटी 50 लाख लीटर पाणी दाखल होत़े पैकी 1 कोटी 50 लाख लीटर पाणी वाया जात असून त्यापैकी 55 लाख लीटर पाणी केवळ गळतीच्या माध्यमातून वाया जात़े तापी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढत आह़ेपाच वर्षात कोटींवर खर्च दरवर्षी तापी जलवाहिनीला लागणा:या गळतीच्या दुरुस्तीवर सुमारे 10 लाख रुपये खर्च होतात़ गेल्या पाच वर्षात पाणी गळतीवर तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आह़े तापी नदीवरून शहराच्या 60 टक्के भागाला पाणीपुरवठा होत असून जलवाहिनीची लांबी 40 कि.मी. आह़े सर्वाधिक गळती या जलवाहिनीला लागत असून या जलवाहिनीवरून सबलाईन 175 कि.मी. असल्याचे सांगण्यात आल़े तापी पाणीपुरवठा योजनेवरील गळतीमधून रोज लाखो लीटर पाणी वाया जात असून ठिकठिकाणी कारंजे उडताना दिसून आल़े, तर बहुतांश ठिकाणी पाण्याचे मोठे डबके साचल्याचे चित्र स्पष्ट आह़े सरवडजवळ तर महिलांसाठी कपडे धुण्याचे मुख्य ठिकाणच झाले आह़े वाढत्या उन्हामुळे लहान मुले तर अंघोळीचा आनंद लुटत आहेत़ काही गळतींचा आधार नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होत असून कापडणे, देवभाने येथील नागरिक कॅन, ड्रमचा आधार घेत पाणी घेऊन जातात़ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला वर्षभरात  ठिकठिकाणी गळती लागली़ योजना जुनी झाली असून त्यामुळे तिची पाईपलाईन जीर्ण झाल्याने वारंवार गळती लागते, असे मनपा अधिका:यांचे म्हणणे आहे.जीर्ण होतेय जलवाहिनी  1991मध्ये जलवाहिनी टाकल्यानंतर आज 2017 वर्ष सुरू होऊन अर्धे संपत आल़े पण या जलवाहिनीचे नूतनीकरण अद्याप करण्यात आलेले नाही.त्यामुळे ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आह़े ही जलवाहिनी आता बदलण्याची आवश्यकता आह़े पण, महापालिकेचे उदासीन धोरण मात्र या कामाला कधी अनुमती देणार? हा प्रश्न आह़ेलाखो लीटर पाणी मातीमोलजलवाहिनीचे काम झाल्यापासून विचार केल्यास शेकडोवेळा जलवाहिनीला गळती लागली आह़े त्यातून लाखो लीटर पाणी मातीमोल झाले आह़े याशिवाय पाणीचोरीचे प्रमाणही दरम्यानच्या काळात वाढले होत़े यावर प्रतिबंध करण्यासाठी मनपाने उपाययोजनाही केली होती़ 10 लाखांची तरतूद तापी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीला खूपच खर्च लागतो़ दरवेळेस महापालिकेकडे पैसे असतातच, असे नाही़ नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही़ या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने आर्थिक नियोजन करत दरवर्षाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद म्हणून या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 10 लाखांचा खर्च अपेक्षित धरला आह़े