शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

नियोजनाच्या अभावापायी पाणीटंचाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST

मालपूर येथे नवीन जलकुंभ मार्गी लागल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु ही आशा फोल ठरत आहे. ...

मालपूर येथे नवीन जलकुंभ मार्गी लागल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु ही आशा फोल ठरत आहे. काही ठिकाणी पाणीटंचाई तर काही ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. हा योग्य नियोजनाचा अभाव असून यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नियोजन करून होणारी पाण्याची नासाडी त्वरित थांबवावी. जेथे गरज असेल तेथे पाण्याची तहान भागवावी, अशी मागणी आहे.

मालपूर गावातील इंदिरानगर भागात तसेच वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये दररोज किंवा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तर वाॅर्ड क्रमांक चार-पाच तसेच राऊळनगर भागात चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे एकाच गावात पाणीपुरवठ्याबाबत वेगवेगळे धोरण दिसून येत आहे. येथील इंदिरानगर भागातील जलकुंभ ओव्हर फ्लो होण्याचे नवीन नसून येथे हा प्रकार सातत्याने दिसून येतो. म्हणून पाणीबचतीसाठी ग्रामपंचायत किती बेफिकीर आहे हे यावरून सिध्द होते. हे वाया जाणारे पाणी किमान जेथे चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो अशा भागात सोडण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र वाॅटरमन यांना संपर्क केला असता पाण्याच्या टाकीत पाणी नाही असे सांगितले जाते. ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत पाण्याचे योग्य नियोजन करावे व वाया जाणाऱ्या पाण्याला पायबंद घालावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.