शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

नियोजनाच्या अभावापायी पाणीटंचाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST

मालपूर येथे नवीन जलकुंभ मार्गी लागल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु ही आशा फोल ठरत आहे. ...

मालपूर येथे नवीन जलकुंभ मार्गी लागल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु ही आशा फोल ठरत आहे. काही ठिकाणी पाणीटंचाई तर काही ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. हा योग्य नियोजनाचा अभाव असून यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नियोजन करून होणारी पाण्याची नासाडी त्वरित थांबवावी. जेथे गरज असेल तेथे पाण्याची तहान भागवावी, अशी मागणी आहे.

मालपूर गावातील इंदिरानगर भागात तसेच वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये दररोज किंवा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तर वाॅर्ड क्रमांक चार-पाच तसेच राऊळनगर भागात चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे एकाच गावात पाणीपुरवठ्याबाबत वेगवेगळे धोरण दिसून येत आहे. येथील इंदिरानगर भागातील जलकुंभ ओव्हर फ्लो होण्याचे नवीन नसून येथे हा प्रकार सातत्याने दिसून येतो. म्हणून पाणीबचतीसाठी ग्रामपंचायत किती बेफिकीर आहे हे यावरून सिध्द होते. हे वाया जाणारे पाणी किमान जेथे चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो अशा भागात सोडण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र वाॅटरमन यांना संपर्क केला असता पाण्याच्या टाकीत पाणी नाही असे सांगितले जाते. ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत पाण्याचे योग्य नियोजन करावे व वाया जाणाऱ्या पाण्याला पायबंद घालावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.