शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

भगवामय वातावरणात धुळ्यात क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 14:55 IST

घोषणाबाजींनी दुमदुमला परिसर : जिल्ह्यातील सकल मराठा व सर्वसमावेशक समाजबांधवांची उपस्थिती

ठळक मुद्देदुपारी १२ वाजून ९ मिनीटांनी मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी १ वाजता हा मोर्चा जुन्या प्रशासकीय संकुलावर आला. तेथे सभेचे रूपांतर मोर्चात झाले. राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील व प्रदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात जिल्हाभरातून ३० ते ३५ हजार मराठा व सर्वसमावेशक समाजबांधवांची उपस्थिती होती. शांततेत पार पडला मोर्चा

लोकतम न्यूज नेटवर्क धुळे :  कोरेगाव भिमा प्रकरणानंतर धुळ्यात ३ रोजी एका विशिष्ट समूहाने मोर्चा काढला. त्यावेळी महापुरुषांचा अवमान होईल, अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील व्यापाºयांच्या दुकानांवर दगडफेक  झाली.  ज्यांचा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही; त्यांना काही समाजकंटकांनी मारहाण केली. या घटनेचा निषेधार्थ शुक्रवारी धुळे जिल्ह्यातील सकल मराठा व सर्वसमावेशक समाजाच्या वतीने क्रांती मोर्चा पार पडला. मोर्चात सहभागी मोर्चेकºयांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत शहरातील परिसर दुमदुमून सोडला. शहरातील जुन्या आग्रारोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा खंडेराव बाजार, पाचकंदील चौक, कराचीवाला खुंट, मनपा, झाशीचा राणीचा पुतळामार्गे जुने प्रशासकीय संकुलापर्यंत आला. तेथे मोर्चाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना संकल मराठा समाजातील वैष्णवी सूर्यवंशी, सायली काळे, ढीना ढबळे, साक्षी मोरे, वैशाली शिरसाठ, विद्या देसले या तरुणींच्या  शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात ३ रोजी निघालेल्या मोर्चात एका विशिष्ट समूहाने महापुरुष व अन्य महनीय नेत्यांच्या विरोधात अश्लिल घोषणाबाजी दिल्या. या अपकृत्याची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. श्यामकांत पाटील, उद्योजक निरंजन भतवाल, गुलशन उदासी, साहेबराव देसाई, अनिल खंडेलवाल व समाजबांधव उपस्थित होते. मोर्चानिमित्त शहरातील चौकाचौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टिका  ३ रोजी झालेला अन्याय यापुढे सहन करणार नाही, असे मनोज मोरे यांनी त्यांच्या मनोगतात सांगत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. बुधवारी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी गांभीर्याने संबंधित अपप्रवृत्तींवर कारवाई केली असती, तर हा उद्रेक आज झाला नसता, असे म्हटले.