शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

भगवामय वातावरणात धुळ्यात क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 14:55 IST

घोषणाबाजींनी दुमदुमला परिसर : जिल्ह्यातील सकल मराठा व सर्वसमावेशक समाजबांधवांची उपस्थिती

ठळक मुद्देदुपारी १२ वाजून ९ मिनीटांनी मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी १ वाजता हा मोर्चा जुन्या प्रशासकीय संकुलावर आला. तेथे सभेचे रूपांतर मोर्चात झाले. राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील व प्रदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात जिल्हाभरातून ३० ते ३५ हजार मराठा व सर्वसमावेशक समाजबांधवांची उपस्थिती होती. शांततेत पार पडला मोर्चा

लोकतम न्यूज नेटवर्क धुळे :  कोरेगाव भिमा प्रकरणानंतर धुळ्यात ३ रोजी एका विशिष्ट समूहाने मोर्चा काढला. त्यावेळी महापुरुषांचा अवमान होईल, अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील व्यापाºयांच्या दुकानांवर दगडफेक  झाली.  ज्यांचा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही; त्यांना काही समाजकंटकांनी मारहाण केली. या घटनेचा निषेधार्थ शुक्रवारी धुळे जिल्ह्यातील सकल मराठा व सर्वसमावेशक समाजाच्या वतीने क्रांती मोर्चा पार पडला. मोर्चात सहभागी मोर्चेकºयांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत शहरातील परिसर दुमदुमून सोडला. शहरातील जुन्या आग्रारोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा खंडेराव बाजार, पाचकंदील चौक, कराचीवाला खुंट, मनपा, झाशीचा राणीचा पुतळामार्गे जुने प्रशासकीय संकुलापर्यंत आला. तेथे मोर्चाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना संकल मराठा समाजातील वैष्णवी सूर्यवंशी, सायली काळे, ढीना ढबळे, साक्षी मोरे, वैशाली शिरसाठ, विद्या देसले या तरुणींच्या  शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात ३ रोजी निघालेल्या मोर्चात एका विशिष्ट समूहाने महापुरुष व अन्य महनीय नेत्यांच्या विरोधात अश्लिल घोषणाबाजी दिल्या. या अपकृत्याची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. श्यामकांत पाटील, उद्योजक निरंजन भतवाल, गुलशन उदासी, साहेबराव देसाई, अनिल खंडेलवाल व समाजबांधव उपस्थित होते. मोर्चानिमित्त शहरातील चौकाचौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टिका  ३ रोजी झालेला अन्याय यापुढे सहन करणार नाही, असे मनोज मोरे यांनी त्यांच्या मनोगतात सांगत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. बुधवारी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी गांभीर्याने संबंधित अपप्रवृत्तींवर कारवाई केली असती, तर हा उद्रेक आज झाला नसता, असे म्हटले.