शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

धुळे जिल्ह्यात ८१ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

यावर्षी हवामान विभागाने सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यानंतरही मृगासोबत आर्द्रा नक्षत्रही कोरडेच गेले. मात्र, पाऊस पडेल, या आशेवर ...

यावर्षी हवामान विभागाने सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यानंतरही मृगासोबत आर्द्रा नक्षत्रही कोरडेच गेले. मात्र, पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली होती.

धुळे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले हाेते. त्यापैकी १९ जुलैपर्यंत ३ लाख ३६ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. एकूण पेरणीची टक्केवारी ८०.७५ टक्के इतकी आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यानंतर पंधरा दिवस विश्रांती घेऊन पुन्हा हजेरी लावली हाेती. पहिला पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, नंतर पावसाने दांडी मारली. त्यामुळे नंतरच्या पावसानंतरच शेतकऱ्यांकडून पेरणी करण्यात आली. तसेच काही शेतकऱ्यांकडे बागायतीची साेय असल्याने त्यांनी कमी पावसातही पेरणी करून टाकली. तीन नक्षत्र काेरडी गेली. तर मंगळवारपासून नवीन नक्षत्र सुरू झाले. या नक्षत्राचे वाहन घाेडा असल्याने व राज्यात सर्वदूर पाऊस पडत असल्याने चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

धुळे तालुका आघाडीवर

जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा धुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे तालुक्यात पेरणीचे प्रमाणही जास्त आहे. तालुक्यात १ लाख ७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ९३ हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. पेरणीची एकूण टक्केवारी ८६.९५ टक्के आहे.

त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्यात पेरणी झालेली आहे. या तालुक्यात १ लाख ७३२ हेक्टर उद्दिष्टापैकी ८१ हजार ४४१ हेक्टरवर म्हणजेच ८०.८५ टक्के पेरणी झालेली आहे. शिरपूर तालुक्यात १ लाख ६ हजार ५९६ हेक्टरपैकी ८५ हजार ९ हेक्टर म्हणजेच ७९.७५ टक्के पेरणी झाली. दरवर्षी सर्वाधिक पाऊस हाेणाऱ्या साक्री तालुक्यात अद्याप चांगला पाऊस नसल्याने तालुक्यात सर्वांत कमी पेरणी झाली आहे. साक्री तालुक्यात १ लाख १ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चत केले हाेते. त्यापैकी केवळ ७६ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे केवळ ७५.१५ टक्केच पेरणी झाली आहे. अजून पंधरा दिवसात चारही तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास पेरणी केलेल्या पिकांना धाेका निर्माण हाेऊ शकताे.