शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खानदेशना लोकेसना जिव्हाळाना प्रकल्प..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी : अहिराणी भाषेतून केली भाषणाला सुरूवात

ठळक मुद्देप्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला जाणारस्वातंत्र्य सैनिक रामेश्वर पोद्दारांची आठवणपाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद

धुळे - आठे जमेल खानदेशना तमाम भाऊ- बहिनीसले मना मन:पूर्वक नमस्कार. तुमी इतला लोके, माले आशीर्वाद देवाले उनात. मी तुमना आभारी शे. खानदेशना लोकेसना जीव्हाळाना प्रकल्प मा मी सहभागी व्हयनू येना माले आनंद शे, अशा शब्दात अहिराणी भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धुळेकरांचे मने जिंकली.शहरातील मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शनिवारी सभा झाली़कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, १२० वर्षापूर्वी धुळे - चाळीसगाव रेल्वे सुरु झाली होती. त्यानंतर आता धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ आज होत आहे. तसेच सुलवाडे - जामफळ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होत आहे. या प्रकल्पामुळे शिंदखेडा व धुळे तालुक्यातील २०० गावांचा फायदा मिळणार असून यामुळे धुळे जिल्हा नंदनवन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पासाठी भरघोस निधी मिळवून दिला. हा सिंचन प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षितसभेत पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशासह महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री सिंचाई कृषी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत देशभरातील ९९ प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे तीन लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.स्वातंत्र्य सैनिकरामेश्वर पोद्दारांची आठवणसभा ज्याठिकाणी झाली ती १४ एकर जमिनी स्वातंत्र्य सैनिक रामेश्वर पोद्दार यांनी गो रक्षण व पालनासाठी दान केली होती. त्यांचे काम प्रेरणादायी आहे. त्यापासून प्रेरणा घेऊनच केंद्र शासनाने पशु पालकांच्या मदतीसाठी कामधेनू आयोगाची स्थापना केली आहे. आयोग हा देशातील गो पशुपालकांना आर्थिक मदत करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचेही पंतप्रधान यांनी यावेळी सांगितले.केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर बी- बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करता येईल. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकºयांच्या खात्यावर साडेसात लाख कोटी रुपये खर्च केले जातील. त्यामुळे शेतकºयांना सावकाराकडे कर्ज मागण्यासाठी जावे लागणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Dhuleधुळे