शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणी पीडित मुलीस न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:50 IST

मागणी : सर्व समाज समावेशक समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन

ठळक मुद्दे याप्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, हे प्रकरण जलद न्यायालयात चालविण्यात यावे, या प्रकरणाची बाल हक्क आयोगामार्फत चौकशी करून सुनावणी घ्यावी. पीडित मुलीला व तिच्या परिवाराला शासकीय खर्चाने पोलीस संरक्षण मिळावे, सह आरोपींना तत्काळ अटक करावी, भविष्यात असे कृ त्य टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमियो करणाºयांच्या विरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. कळमसरे (ता. अमळनेर) येथे मुलीवर अत्याचार प्रकरणी नराधमास कठोर शिक्षा करावी.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  दोंडाईचा येथील पाच वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सीआयडी चौकशी करून संबंधित पीडित मुलीस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा सर्व समाज समावेशतर्फे गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा सर्व समाज समावेशकतर्फे गुरुवारी महा मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मूकमोर्चाची सांगता जिजामाता शाळा येथे झाली. त्यानंतर तरुणींच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की दोंडाईचा येथे ८ फेब्रुवारीला नूतन विद्यालयाच्या परिसरात पाच वर्षाच्या बालिकेवर नराधमाने अत्याचा केला. ही घटना पीडित मुलीच्या शारीरिक तपासणीनंतर उजेडात आली. यासंदर्भात पीडित मुलीच्या आई, वडीलांनी संस्थाचालक, मुख्याध्यापक व इतर कर्मचाºयांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. माहिती देण्यास टाळाटाळ केली. पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणी काही लोकांची भूमिका ही संशायास्पद दिसून येत आहे. त्यामुळेच या घटनेचा गुन्हा दाखल होण्यास उशीर झाला. त्यामुळे संशयित आरोपीला पळून जाण्यासाठी  वेळ  मिळाला. आता याप्रकरणी मुख्य  आरोपीस अटक करण्यात आली असून तपास अधिकारी व यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे, हे स्पष्ट होते. यावेळी साक्षी मोरे, रोशनी चौधरी, सेजल बैसाणे, सिद्धी करनकाळ, हिमाणी वाघ, भाविका चौधरी, हर्षदा चौधरी, सपना चौधरी, रूपाली चौधरी, इशा बेडसे, साक्षी चौधरी, किरण पाटील, प्रणाली चौधरी, सुरेखा नांद्रे आदी उपस्थित होत्या. पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणाला आज एक महिना पूर्ण होत आहे. आतापर्यंत मुख्य आरोपीला अटक झाली असून सहआरोपीला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. परिरामी, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. 

१५ मार्चनंतर तीव्र आंदोलन 

दरम्यान, निवेदनातील मागण्या त्वरित निकाली न निघाल्यास १५ मार्चनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.