शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

टीईटी पास नसलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; उत्तीर्ण उमेदवार नाेकरीपासून वंचित राहिल्याचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST

टीईटी पास नसलेल्या शिक्षकांच्या माहितीबद्दल शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे बोट दाखविले तर माध्यमिक शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाकडे माहिती ...

टीईटी पास नसलेल्या शिक्षकांच्या माहितीबद्दल शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे बोट दाखविले तर माध्यमिक शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाकडे माहिती असल्याचे सांगत जबाबदारी झटकली. धुळ्याचा अतिरिक्त कार्यभार असलेले औरंगाबादचे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते कार्यालयत येत नाहीत. शिक्षण विभागाच्या न्यायालयीन कामांमध्ये औरंगाबाद खंडपीठात त्यांना गुंतविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाकडे टीईटी पास नसलेल्या शिक्षकांची ९ प्रकरणे असल्याचे शिक्षणाधिकारी मनिष पवार यांनी सांगितले; परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णयाप्रमाणे त्यांना मान्यता देण्यात आली होती; परंतु या शिक्षकांना सेवासातत्य दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बाबतीत शासनाचे मार्गदर्शन मागविले आहे, असे ते म्हणाले.

जि. प. शाळांमध्ये अशी प्रकरणे नाहीत ?

जिल्हा परिषद शाळांमध्ये टीईटी झालेल्या उमेदवारांचीच शिक्षक भरती केली जाते. त्यामुळे या शाळांमध्ये अशी प्रकरणे नसल्याचे शिक्षण विभागासह शिक्षक संघटनांकडूनही सांगण्यात आले. मुळात अशी प्रकरणे आहेत. परंतु मागील काळात नियमबाह्यपणे भरती प्रक्रिया झाली असल्याने लपवाछपवी केली जात असल्याची धक्कादायक माहितीदेखील जाणकारांकडून मिळाली. खासगी संस्थाचालकांनी मर्जीतल्या उमेदवारांना नोकरी देण्यासाठी टीईटी झालेल्या उमेदवारांना डावलल्याची माहितीदेखील यामुळे पुढे आली आहे. परंतु या विषयाची सर्वांचीच प्रतिक्रिया मोघम स्वरूपाची आहे. स्पष्ट माहिती देण्यास कुणीही धजावत नसल्याचे दिसून आले; परंतु औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर टीईटी झालेल्या उमेदवारांना न्याय मिळणार असून, पैसा आणि वशिल्यांच्या बळावर नोकरी मिळविणाऱ्यांना ‘घरचा रस्ता’ धरावा लागेल, अशा संतप्त प्रतिक्रियादेखील उमटल्या.

टीईटी पास नसलेल्या शिक्षकांची माहिती देण्यास शिक्षण विभाग आणि संघटनादेखील टाळाटाळ करत असल्याने संशयाला जागा आहे.

शिक्षक संघटनांच्या संमिश्र प्रतिक्रिया

न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. परंतु यामुळे नोकरी गेल्यास शिक्षक बेरोजगार होतील आणि त्यांचे कुटुंब उघड्यावर येईल. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. घटनेच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावर आमदार कपिल पाटील प्रयत्नशील आहेत. पाठपुरावा सुरू आहे. लढा सुरुच राहील.

- दिलीप पाटील, पदाधिकारी, शिक्षक भारती संघटना

खासगी शिक्षण संस्थाचालकांनी टीईटी उत्तीर्ण नसलेले मर्जीतले शिक्षक भरती करून घेतले आहेत. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार नोकरीपासून वंचित राहिले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही स्वागतच करतो. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण केलेल्या प्रामाणिक उमेदवारांना संधी मिळले.

- शिवानंद बैसाणे, अध्यक्ष, धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती

शिक्षणाधिकारी काय म्हणतात...

१३ फेब्रुवारी २०१३ च्या शासननिर्णयानुसार ९ शिक्षकांना मान्यता दिली होती. अनुदानित शाळांमधील ही न्यायालयीन प्रकरणे आहेत. परंतु त्यांना सेवासातत्य दिलेले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता शासनाचे मार्गदर्शन मागविले आहे. शासनाच्या सूचनांप्रमाणे याेग्य ती कार्यवाही केली जाईल.

- मनिष पवार, शिक्षणाधिकारी

जिल्ह्यातील एकूण शिक्षक ८८६१

अनुदानित शाळांतील शिक्षक ६९२५

विना अनुदानित शाळांतील शिक्षक १३७

कायम विना अनुदानित शाळांतील शिक्षक १८९९