शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणसरींचा झाला दमदार वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:40 IST

धुळे जिल्हा : दिवसभर सूर्याचे दर्शन झालेले नाही, पावसामुळे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठेत नेहमीपेक्षा गर्दी कमी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :शहरासह जिल्ह्यात गुरूवारी दमदार श्रावणसरींचा वर्षाव झाला.दिवसभर सुरू राहिलेल्या रिपरिप पावसामुळे शहरासह जिल्हावासिय ओलेचिंब झाले. बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर असा पाऊस झाल्याने नागरिक समाधानी झाले आहेत.शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. रात्रीही पाऊस झाला. तर गुरूवारची पहाट पावसानेच उगवली. सकाळपासून थोड्या-थोड्या अंतराने पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी कार्यालयात जाण्याच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्याने कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. सुमारे अर्धातास झालेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढतांना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. तर पादचाºयांना या पाण्यातून मार्गक्रमण करण्यावाचून पर्याय राहिला नव्हता. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांनीही दुकानांचा आसरा घेत पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.रस्त्याचे तीनतेरादरम्यान दोन महिन्यांपूर्वीच येथील छोट्यापुलावर डांबरीकरण करण्यात आलेले होते. मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे या पुलावरील डांबर उखडलेले आहे. त्यामुळे पुलावर जागोजागी खड्डे पडले असून, यातून मार्ग काढतांनाही चालकांना कसरत करावी लागत होती.धुळे तालुक्यातील नेर गावातही दमदार पाऊस झालेला आहे. तिसगाव ढंढाणे परिसरातही पाऊस होता.तर शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात १२ आॅगस्ट रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळ पासुन संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. येथील नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती ती या पावसामुळे काहीशी पूर्ण झाली.दरम्यान दोंडाईचा शहरातही गुरूवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवला. नेहमीपेक्षा बाजारात गर्दी कमी होती.साक्री, पिंपळनेर या परिसरातही कधी रिपरिप तर कधी दमदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.श्रावण महिन्यात होत असलेल्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. पोळ्यापूर्वीच होत असलेल्या पावसामुळे शेतकरीवर्ग समाधानी आहे.