शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पाटचारीचे पाणी अखेर पोहोचले शेतांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:30 IST

कनोली प्रकल्प : रब्बी पिकांना मिळणार जीवदान, शेकडो शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील कनोली मध्यम प्रकल्पाच्या पाटचारी क्रमांक तीनचे पाणी अखेर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचल्याने रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे़ त्यामुळे विंचूर, तरवाडे, नाणे, सिताणे येथील शेकडो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ १५ तारखेपर्यंत पाटचारी तीनचे पाणी सुरू राहणार आहे़ त्यामुळे शेतकºयांनी अधिकृतरित्या मागणी नोंदवावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे़गेल्या आठवड्यात कनोली प्रकल्पाच्या पाण्याचा वाद चिघळला होता़ ४६ वर्षांपूर्वी आकारास आलेल्या या कनोली प्रकल्पातील पाणी पाटचाºयांमध्ये सोडण्यासाठी मोठी तांत्रिक अडचण आहे़ एका पाटचारीत पाणी सोडण्यासाठी दुसरी पाटचारी बंद करावी लागते़ पाटचारी तीनमध्ये पाणी सोडण्यासाठी पाटचारी एकचे पाणी बंद करावे लागते़ परंतु पाणी बंद करण्यासा पाटचारी एकवरील बोरकुंड आणि नंदाळे येथील शेतकºयांनी विरोध केला होता़ प्रसंगी पाटचारीवरच आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़ दुसरीकडे पाण्याअभावी पिके करपू लागल्याने पाटचारी तीनवरील शेतकºयांनी देखील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आक्रमक आंदोलन करुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता़ या संपूर्ण प्रकरणात धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची गोची झाली होती़ यावर तोडगा काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी पोलिस बंदोबस्तात सहा तारखेला पाटचारी एकचे पाणी बंद करुन पाटचारी तीनमध्ये पाणी सोडले़ त्यामुळे येथील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़शुक्रवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाटचारी एक बंद करण्यासाठी गेले त्यावेळी काही शेतकºयांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला़ परंतु पोलिस कर्मचाºयांनी खाक्या दाखवताच त्यांनी माघार घेतली़ पाटचारी एक बंद करण्याची आणि पाटचारी तीनमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली़दरम्यान, पाटचारी एक आणि दोनच्या शेतकºयांनी परस्पर गेट उघडून पाणी चोरण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे़अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी स्थानिक शेतकºयांची पाणीवापर संस्था सुरू झाली पाहिजे़ परंतु गेल्या चार वर्षांपासून पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पात ठणठणाट होता़ त्यामुळे संस्था स्थापण्याचा उत्सुकता नाही़

टॅग्स :Dhuleधुळे