शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

धुळे शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची नासाडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:43 IST

रोज हजारो लीटर पाणी वाया : अनारोग्य फैलण्याचाही धोका; महापालिकेची यंत्रणा मात्र सुस्त

ठळक मुद्देदुस-या सांगे ब्रह्मज्ञान..मनपाच्या कारभाराची स्थिती पाणी मिळत नसताना ते वाया जात असल्याने नागरिकांमध्ये रोषगळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करणार, उपायुक्तांची माहिती  

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराला पाणीपुरवठा करणा-या  पाईपलाईनला जागोजागी लागलेल्या गळत्यांमुळे रोजी हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया जात असून भर उन्हाळ्यात सुद्धा ही परिस्थिती कायम आहे. एकीकडे शहरातील बहुतांश भागांना नियोजन नसल्याने सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. तर दुसरीकडे हजारो लीटर स्वच्छ पाणी वाहून वाया जात आहे. भरीस भर म्हणजे या गळत्यांमुळे  नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान...डेंग्यूचे डास निर्माण होतील म्हणून मनपा नागरिकांना आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे उपसण्यास सांगते, भांडे घासून स्वच्छ करण्यास सांगते. मात्र शहरात अनेक ठिकाणी गळतीमुळे वाया जाणाºया पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने अनारोग्य फैलण्याची दाट शक्यता आहे. या मुळे महापालिकेची स्थिती ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ अशी झाली आहे. साक्रीरोडवर पं.नेहरू उद्यानाजवळ, जवाहर नगर, सिंहस्थ नगर, हनुमान टेकडी जलशुद्धीकरण, संतोषीमाता मंदिर चौक, दत्तमंदिर चौक, पारोळा रोड, वडजाई रोड, जमनागिरी रस्ता अशा विविध भागांत गळत्यांद्वारे पाणी वाया जात असून मनपा यंत्रणेस त्याचे काही सोयरसुतक उरलेले दिसत नाही. या मुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. साक्रीरोडवरील मोठ्या गळतीकडेही अद्याप दुर्लक्ष शहरातील साक्रीरोडवर पंडित जवाहरलाल उद्यानालगत लागलेल्या गळतीतून रोज हजारो लीटर स्वच्छ पाणी नजीकच्या गटारातून वाहत वाया जात आहे.या गळतीबाबतही स्थानिक नागरिकांनी मनपाला कळविले, तक्रारी केल्या. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या गळतीची दुरुस्ती झालेली नाही. अद्याप या गळतीतून पाणी वाहून वाया जात आहे. भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोल न समजणा-या मनपाच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. शहरातील साक्रीरोडवर असलेल्या जवाहर नगरात गळतीमुळे गटारातून वाहणाºया स्वच्छ पाण्यात मोठ्या संख्येने डेंग्यूच्या डासाच्या अळ्या दिसून आल्या. मोठ्या वस्तीतून ही गटार वाहते. परंतु मनपा आरोग्य विभागास इकडे पाहण्यास वेळ नाही. नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत यापूर्वीच मनपाला कळविल्याचे सांगितले.मनपा गळत्या शोधून दुरूस्ती करणार मार्चअखेर वसुलीचे काम  संपल्याने कर्मचाºयांची पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकातील कर्मचारी  शहराच्या विविध भागात गळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  

 

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका