शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

धुळे शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची नासाडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:43 IST

रोज हजारो लीटर पाणी वाया : अनारोग्य फैलण्याचाही धोका; महापालिकेची यंत्रणा मात्र सुस्त

ठळक मुद्देदुस-या सांगे ब्रह्मज्ञान..मनपाच्या कारभाराची स्थिती पाणी मिळत नसताना ते वाया जात असल्याने नागरिकांमध्ये रोषगळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करणार, उपायुक्तांची माहिती  

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराला पाणीपुरवठा करणा-या  पाईपलाईनला जागोजागी लागलेल्या गळत्यांमुळे रोजी हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया जात असून भर उन्हाळ्यात सुद्धा ही परिस्थिती कायम आहे. एकीकडे शहरातील बहुतांश भागांना नियोजन नसल्याने सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. तर दुसरीकडे हजारो लीटर स्वच्छ पाणी वाहून वाया जात आहे. भरीस भर म्हणजे या गळत्यांमुळे  नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान...डेंग्यूचे डास निर्माण होतील म्हणून मनपा नागरिकांना आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे उपसण्यास सांगते, भांडे घासून स्वच्छ करण्यास सांगते. मात्र शहरात अनेक ठिकाणी गळतीमुळे वाया जाणाºया पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने अनारोग्य फैलण्याची दाट शक्यता आहे. या मुळे महापालिकेची स्थिती ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ अशी झाली आहे. साक्रीरोडवर पं.नेहरू उद्यानाजवळ, जवाहर नगर, सिंहस्थ नगर, हनुमान टेकडी जलशुद्धीकरण, संतोषीमाता मंदिर चौक, दत्तमंदिर चौक, पारोळा रोड, वडजाई रोड, जमनागिरी रस्ता अशा विविध भागांत गळत्यांद्वारे पाणी वाया जात असून मनपा यंत्रणेस त्याचे काही सोयरसुतक उरलेले दिसत नाही. या मुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. साक्रीरोडवरील मोठ्या गळतीकडेही अद्याप दुर्लक्ष शहरातील साक्रीरोडवर पंडित जवाहरलाल उद्यानालगत लागलेल्या गळतीतून रोज हजारो लीटर स्वच्छ पाणी नजीकच्या गटारातून वाहत वाया जात आहे.या गळतीबाबतही स्थानिक नागरिकांनी मनपाला कळविले, तक्रारी केल्या. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या गळतीची दुरुस्ती झालेली नाही. अद्याप या गळतीतून पाणी वाहून वाया जात आहे. भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोल न समजणा-या मनपाच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. शहरातील साक्रीरोडवर असलेल्या जवाहर नगरात गळतीमुळे गटारातून वाहणाºया स्वच्छ पाण्यात मोठ्या संख्येने डेंग्यूच्या डासाच्या अळ्या दिसून आल्या. मोठ्या वस्तीतून ही गटार वाहते. परंतु मनपा आरोग्य विभागास इकडे पाहण्यास वेळ नाही. नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत यापूर्वीच मनपाला कळविल्याचे सांगितले.मनपा गळत्या शोधून दुरूस्ती करणार मार्चअखेर वसुलीचे काम  संपल्याने कर्मचाºयांची पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकातील कर्मचारी  शहराच्या विविध भागात गळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  

 

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका