शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

प्रवासी भाड्यात वाढ; पण सुविधांची बोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 21:26 IST

अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर : गाडीचे स्वरूप पूर्वीसारखेच राहू द्या; प्रवाशांची मागणी

ठळक मुद्दे रेल्वे प्रशासनाने सदर गाडीचे ४ आॅगस्ट म्हणजे शुक्रवारपासून अमरावती -सूरत एक्सप्रेस १९०२५ व १९०२६ असे नाव व गाडी क्रमांक बदलून भाड्यात वाढ केली आहे. सदर गाडीचा वेळात व सुविधांमध्ये दुसरी कोणतीही सुधारणा व दर्जा न सुधारता केलेली वाढ अन्यायकारक असल्याचे महत्वाचे म्हणजे भाड़े वाढ केल्यापासून या गाडीने प्रवास करणाºयांची संख्या कमालीची रोडावली आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वीचाच म्हणजे फास्ट पसेंजरचा दर्जा या गाड़ीला देऊन तिचे भाडेही पूर्वीप्रमाणेच आकारावे, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहक व प्रवासी संघटनेने केली लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना भाडे कमी करण्याबाबत साकडे घालावे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : रेल्वेप्रशासनाने सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकसाठी सुरु असलेल्या  अमरावती  फास्ट पसेंजर या गाडीचे रूपांतर आता मेल एक्सप्रेसमध्ये केले असून प्रवासी भाड्यात  सुमारे ६६ टक्के वाढ केली आहे. मात्र कोणत्याही जादा सुविधा न पुरविता म्हणजे सुविधांच्या नावाने बोंब असताना भाडेवाढ झाल्याने  सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने अमरावती -सूरत फास्ट पॅसेंजरचे रूपांतर शुक्रवार ४ आॅगस्ट पासून अमरावती -सूरत मेल असे केले असून प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. सूरत -अमरावती भाड़े पूर्वी ११५ रुपए होते ते आता १९५ रुपये झाले आहे. येथून सुरत येथे जाण्यासाठी पूर्वी ४५ रुपये भाड़े होते ते आता ७५ रुपये झाले आहे . अमरावतीला पूर्वी ७० रुपये भाडे लागत असे, आता मात्र त्यासाठी १२० रुपए मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई  पाटील यांचा पुढाकाराने २००७ साली  अमरावती -सूरत फास्ट पैसेंजर सुरु झाली होती. अमरावती, अकोला, जळगाव, धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील  सर्वसामान्य शेतमजूर व आर्थिक दुर्बल घटकातील प्रवाशांची  सूरत, शेगाव व जळगाव जाण्यासाठी सोय व्हावी म्हणून गाडी क्रमांक ५९०२५  व गाडी क्रमांक ५९०२६  सुरू केली होती.     येथील रेल्वे स्थानकावरून सूरतकडे जाण्यासाठी संध्याकाळी ४.२३ वाजता सोमवार, शुक्रवार व शनिवार तर भुसावळकडे जाण्यासाठी  गुरूवार, शुक्रवार व शनिवार असे प्रत्येकी तीन-तीन दिवस सदर गाडीची सुविधा आहे. कामानिमित्त हजारो मजूर या गाडीने प्रवासी करतात.  त्यांना ही गाडी अल्प खर्चिक असल्याने वरदान ठरली होती.  गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी यापूर्वी भाविक अल्प भाड्याने जात असत. फारशा सुविधा नसल्या तरी कमी भाड्यामुळे या गाडीला प्रवासी मोठ्या संख्येने मिळत असत.