शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

प्रवासी भाड्यात वाढ; पण सुविधांची बोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 21:26 IST

अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर : गाडीचे स्वरूप पूर्वीसारखेच राहू द्या; प्रवाशांची मागणी

ठळक मुद्दे रेल्वे प्रशासनाने सदर गाडीचे ४ आॅगस्ट म्हणजे शुक्रवारपासून अमरावती -सूरत एक्सप्रेस १९०२५ व १९०२६ असे नाव व गाडी क्रमांक बदलून भाड्यात वाढ केली आहे. सदर गाडीचा वेळात व सुविधांमध्ये दुसरी कोणतीही सुधारणा व दर्जा न सुधारता केलेली वाढ अन्यायकारक असल्याचे महत्वाचे म्हणजे भाड़े वाढ केल्यापासून या गाडीने प्रवास करणाºयांची संख्या कमालीची रोडावली आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वीचाच म्हणजे फास्ट पसेंजरचा दर्जा या गाड़ीला देऊन तिचे भाडेही पूर्वीप्रमाणेच आकारावे, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहक व प्रवासी संघटनेने केली लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना भाडे कमी करण्याबाबत साकडे घालावे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : रेल्वेप्रशासनाने सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकसाठी सुरु असलेल्या  अमरावती  फास्ट पसेंजर या गाडीचे रूपांतर आता मेल एक्सप्रेसमध्ये केले असून प्रवासी भाड्यात  सुमारे ६६ टक्के वाढ केली आहे. मात्र कोणत्याही जादा सुविधा न पुरविता म्हणजे सुविधांच्या नावाने बोंब असताना भाडेवाढ झाल्याने  सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने अमरावती -सूरत फास्ट पॅसेंजरचे रूपांतर शुक्रवार ४ आॅगस्ट पासून अमरावती -सूरत मेल असे केले असून प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. सूरत -अमरावती भाड़े पूर्वी ११५ रुपए होते ते आता १९५ रुपये झाले आहे. येथून सुरत येथे जाण्यासाठी पूर्वी ४५ रुपये भाड़े होते ते आता ७५ रुपये झाले आहे . अमरावतीला पूर्वी ७० रुपये भाडे लागत असे, आता मात्र त्यासाठी १२० रुपए मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई  पाटील यांचा पुढाकाराने २००७ साली  अमरावती -सूरत फास्ट पैसेंजर सुरु झाली होती. अमरावती, अकोला, जळगाव, धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील  सर्वसामान्य शेतमजूर व आर्थिक दुर्बल घटकातील प्रवाशांची  सूरत, शेगाव व जळगाव जाण्यासाठी सोय व्हावी म्हणून गाडी क्रमांक ५९०२५  व गाडी क्रमांक ५९०२६  सुरू केली होती.     येथील रेल्वे स्थानकावरून सूरतकडे जाण्यासाठी संध्याकाळी ४.२३ वाजता सोमवार, शुक्रवार व शनिवार तर भुसावळकडे जाण्यासाठी  गुरूवार, शुक्रवार व शनिवार असे प्रत्येकी तीन-तीन दिवस सदर गाडीची सुविधा आहे. कामानिमित्त हजारो मजूर या गाडीने प्रवासी करतात.  त्यांना ही गाडी अल्प खर्चिक असल्याने वरदान ठरली होती.  गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी यापूर्वी भाविक अल्प भाड्याने जात असत. फारशा सुविधा नसल्या तरी कमी भाड्यामुळे या गाडीला प्रवासी मोठ्या संख्येने मिळत असत.