शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

कांदा लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 13:35 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम येथील घेत होते. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम येथील घेत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून येथील अमरावती मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने विहिरींसह जमिनीतील जलस्रोत चांगलाच वाढला आहे. यामुळे खरीपापेक्षा रब्बी हंगामातील क्षेत्रफळात येथे वाढ होत आहे. उजव्या व डाव्या कालव्याच्या आजूबाजुला देखील बागायती शेतजमिनीत वाढ होताना दिसून येत आहे. यंदा रांगडा कांद्याचे क्षेत्रफळ वाढणार असल्याचे दिसून येत आहे.कांदा हे सर्वात जास्त पाण्याचे पिक आहे. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे व बाजारात कांद्याला चांगला भाव असल्याने येथील शेतकर्‍यांनी उन्हाळी रांगडा कांद्याला पसंती दिली असून त्यासाठी लागणारे रोपे चांगलीच वाढीस लागली आहेत. साधारणत: रोप तयार झाल्यावर पुढील आठवड्यात रांगडा कांद्याच्या लागवडीस सुरुवात होईल. यावर्षी मालपूरसह सुराय, चुडाणे, अक्कलकोस, सुराय, कर्ले, परसोळे, देवी, सतारे, वैंदाणे, ऐचाळे, शनिमांडळ आदी भागात रांगडा कांद्याच्या क्षेत्रफळात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी टाकलेल्या कांदा रोपावरुन व लागवडीसाठी राखून ठेवलेल्या शेत जमिनीवरुन दिसून येत आहे.येथील शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो किंमतीचे महागडे कांदा बियाणे लागवडीसाठी रोप म्हणून टाकले आहे. साधारणत: दोन महिन्याचे रोप झाल्यानंतर लागवड होत असते. त्यामुळे कांदा लागवडीच्या हालचाली शेतशिवारात दिसून येत आहे.खरीपातील कांद्याने यावर्षी येथील शेतकर्‍यांना दगा दिला. बुरशीजन्य आजारामुळे उत्पादनात मोठी घट आली. कांद्याची पात चांगली वाढीस लागलीच नाही. एकरी फक्त पाच क्विंटल उत्पादन निघाल्यामुळे त्यातून खर्च देखील निघाला नाही. खरीपातील कसर रब्बीत काढण्यासाठी येथील कांदा उत्पादक शेतकरी सरसावले असून मालपूरसह परिसरात कांदा उत्पादनात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. मालपूर येथे बेड, सर पध्दतीने तसेच गादी वाफ्यावर कांद्याची लागवड करतात. काही शेतकरी ठिंबक सिंचनाचा देखील आधार घेतात. तर काही स्प्रिंगकलरचा उपयोग करुन कांद्याचे चांगले उत्पादन घेत असतात. रांगड्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव कमी जाणवतो. म्हणून हमखास उत्पन्न हाती लागते. कांदा हे नगदी पीक असून कांदा उत्पादनातून येथे बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे.