शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 13:35 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम येथील घेत होते. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम येथील घेत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून येथील अमरावती मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने विहिरींसह जमिनीतील जलस्रोत चांगलाच वाढला आहे. यामुळे खरीपापेक्षा रब्बी हंगामातील क्षेत्रफळात येथे वाढ होत आहे. उजव्या व डाव्या कालव्याच्या आजूबाजुला देखील बागायती शेतजमिनीत वाढ होताना दिसून येत आहे. यंदा रांगडा कांद्याचे क्षेत्रफळ वाढणार असल्याचे दिसून येत आहे.कांदा हे सर्वात जास्त पाण्याचे पिक आहे. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे व बाजारात कांद्याला चांगला भाव असल्याने येथील शेतकर्‍यांनी उन्हाळी रांगडा कांद्याला पसंती दिली असून त्यासाठी लागणारे रोपे चांगलीच वाढीस लागली आहेत. साधारणत: रोप तयार झाल्यावर पुढील आठवड्यात रांगडा कांद्याच्या लागवडीस सुरुवात होईल. यावर्षी मालपूरसह सुराय, चुडाणे, अक्कलकोस, सुराय, कर्ले, परसोळे, देवी, सतारे, वैंदाणे, ऐचाळे, शनिमांडळ आदी भागात रांगडा कांद्याच्या क्षेत्रफळात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी टाकलेल्या कांदा रोपावरुन व लागवडीसाठी राखून ठेवलेल्या शेत जमिनीवरुन दिसून येत आहे.येथील शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो किंमतीचे महागडे कांदा बियाणे लागवडीसाठी रोप म्हणून टाकले आहे. साधारणत: दोन महिन्याचे रोप झाल्यानंतर लागवड होत असते. त्यामुळे कांदा लागवडीच्या हालचाली शेतशिवारात दिसून येत आहे.खरीपातील कांद्याने यावर्षी येथील शेतकर्‍यांना दगा दिला. बुरशीजन्य आजारामुळे उत्पादनात मोठी घट आली. कांद्याची पात चांगली वाढीस लागलीच नाही. एकरी फक्त पाच क्विंटल उत्पादन निघाल्यामुळे त्यातून खर्च देखील निघाला नाही. खरीपातील कसर रब्बीत काढण्यासाठी येथील कांदा उत्पादक शेतकरी सरसावले असून मालपूरसह परिसरात कांदा उत्पादनात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. मालपूर येथे बेड, सर पध्दतीने तसेच गादी वाफ्यावर कांद्याची लागवड करतात. काही शेतकरी ठिंबक सिंचनाचा देखील आधार घेतात. तर काही स्प्रिंगकलरचा उपयोग करुन कांद्याचे चांगले उत्पादन घेत असतात. रांगड्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव कमी जाणवतो. म्हणून हमखास उत्पन्न हाती लागते. कांदा हे नगदी पीक असून कांदा उत्पादनातून येथे बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे.