शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

संततधार पावसामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:08 IST

ठिकठिकाणी जलपूजन : नदी, नाले, बंधारे आणि धरणही तुडूंब, शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे, सुराय येथील पाणी टँकर बंद

धुळे- जिल्ह्यात अपवाद वगळता संततधार पाऊस सुरूच आहे. यामुळे नदी, नाले, बंधारे आणि धरणही ओसंडून वाहत आहे. यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान साक्री तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पांझरा, बुराई नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे, सुराय येथील पिण्याच्या पाण्याचा टँकर बंद झाला आहे.साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शनिवारी सकाळपासूनच ‘ओव्हर फ्लो’ झाले. त्यामुळे पिंपळनेर येथे पांझरा नदीस मोठा पूर आला. हे पाणी अक्कलपाडा धरणात पोहचले. अक्कलपाडा धरणही ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे गेट उघडण्यात आले आहे. दरम्यान, पांझरा नदीच्या पुरामुळे मलांजन, देगाव आदी गावांचा संपर्क तूर्तास तुटला आहे. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर पावसाने दडी मारली. यामुळे पेरण्या केलेले शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीने संकटात सापडले होते. मात्र पंधरवड्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. तसेच उर्वरीत पेरण्यांचे कामही आटोपले आहे. सध्या पिकांची जोमदार वाढ होत असून संततधार पाऊस सुरु आहे. पिंपळनेर येथे रस्ते व पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने स्थानिक प्र्रशासनांनी नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पिंपळनेर शहरात पुरामुळे नदीलगत असलेल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मालपूर परिसरात गावांचा पाणीप्रश्न मार्गी*मालपूर- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे चुडाणे येथील पाण्याचे टॅँकर बंद झाले. तर सुरायचा पाणी टंचाईचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.*मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, अवकलकोस, कलवाडे, कर्ले, परसोळे, देवकानगर, वैंदाणे या भागात ४ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून दमदार पाऊस होत आहे. ४पहाटेच्या सुमारास या परिसराला पावसाने झोडपून काढले. झालेल्या पावसामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या बंधाºयांमध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.*शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईचा सामना चुडाणे- सुराय या गावांना करावा लागतो. चुडाणे येथे गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यातही पाण्याचे टॅँकर सुरू होते. मात्र गावालगत झालेले सर्वच बंधारे भरल्याने, गावविहिरीला पाणी आले. त्यामुळे येथील पाण्याचे टॅँकर बंद करण्यात आल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. *सुराय गावालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र होत असलेल्या दमदार पावसामुळे गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर तुडूंब भरल्याने, गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ४मालपूर गावातही रविवारी  पहाटेपासून येथे पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या बंधाºयांमध्ये पाणी साचले आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे