शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

अवकाळी पावसाचा ४८ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:19 IST

वादळी पाऊस, गारपीट : ४४२.५८ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान

धुळे : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा चारही तालुक्यांना फटका बसला असून ४४२.५८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे कमी-अधिक फरकाने नुकसान झाल्याचे सुधारित प्राथमिक अंदाजाच्या अहवालात म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने केळी, पपई, मका, लिंबू, आंबा, बाजरी व भाजीपाला पिकांचा समावेश आहे. साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.गेल्या महिन्यात १५, १६ व १७ असे सलग तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात जिल्ह्यातील गोराणे, कंचनपूर, अजनाड, विखरण, हिसाळे, वाघाडी, भोरखेडा, तरडी, तोंदे, नटवाडे, आलण, थाळनेर, बोराडी, मुखेड, बलकुव, तºहाड कसबे, साक्री आदी शिवारात वादळी पावसाने धुमाकूळ घातला होता. सोबत गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला होता. त्यानंतर आता सुधारित प्राथमिक नजर अंदाज प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४८ गावांमधील सुमारे ८५० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद केले असून एकूण ४४२.५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात ३३ टक्क्यापेक्षा जास्त बाधित क्षेत्र ३६४.०१ हेक्टर तर त्यापेक्षा कमी बाधित क्षेत्र ७८.५७ हेक्टर आहे. सुधारित प्राथमिक अंदाजानुसार साक्री तालुक्यात सर्वाधिक म्हजे ३०४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तर सर्वात कमी धुळे तालुक्यात ५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या समितीकडून नुकसानाचा अहवाल तयार करून तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविला जाईल. त्यानंतर कृषी विभागाकडून झालेल्या पिकांच्या नुकसानाचे मूल्यांकन केले जाईल.जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समितीकडून अंतिम अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे असे सूत्राकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे