शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

मंजूर वीज उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करा

By admin | Updated: January 10, 2017 23:57 IST

मालपूर येथे उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे.

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विद्युत वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र मंजूर असून ते त्वरित कार्यान्विय करून येथील शेतक:यांचा रब्बी हंगाम वाचवावा,  अशी मागणी येथील शेतक:यांनी केली आहे. उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे. तालुक्यातील मालपूर येथे 33-11 क्षमतेचे वीज उपकेंद्र गेल्या वर्षभरापासून मंजूर आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीच्या कारभारामुळे ते अजून कार्यान्वित होताना दिसून येत नाही. याचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर चिंता दिसून येत आहे.मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड व पेरणी पूर्ण झाली असून या पिकांना आता पाणी देण्याची गरज येऊन ठेपली आहे. रब्बीतील पीक हे विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून असतात, यासाठी अखंडित व पूर्ण दाबाने वीज आवश्यक आहे, मात्र येथे उपकेंद्र नसल्यामुळे दोंडाईचा येथून विजेचा पुरवठा केला जातो.दोंडाईचा येथून 20 कि.मी. दूर्पयत हा विजेचा पुरवठा होतो. ज्या विद्युत तारेतून पुरवठा होत असतो त्या खूप जुन्या व जीर्ण झाल्यामुळे तारा तुटून तांत्रिक बिघाड हा सतत होत असल्यामुळे मालपूर येथील मंजूर उपकेंद्र त्वरित कार्यान्वित होणे गरजेचे झाले आहे. झालेला तांत्रिक बिघाड शोधण्यासाठीदेखील खूप वेळ लागतो. यातच कधीकधी तर दिवस जातो. यामुळे शेती पिकांचेदेखील नुकसान होत आहे. तसेच 132 केव्ही दोंडाईचा येथून हा पुरवठा होतो. अंतर जास्त असल्यामुळे तसेच इतर गावांना देखील येथूनच वीजपुरवठा होत असतो. यामुळे विजेला पूर्ण दाब राहत नाही व शेतक:यांच्या यामुळे विद्युत मोटारीदेखील फिरत नसल्यामुळे हे उपकेंद्र त्वरित होणे आवश्यक आहे.आधीच खरिपात या परिसरातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मोडून पडला आहे, आता संपूर्ण आशा रब्बीवर टिकून आहेत.