शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर वीज उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करा

By admin | Updated: January 10, 2017 23:57 IST

मालपूर येथे उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे.

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विद्युत वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र मंजूर असून ते त्वरित कार्यान्विय करून येथील शेतक:यांचा रब्बी हंगाम वाचवावा,  अशी मागणी येथील शेतक:यांनी केली आहे. उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे. तालुक्यातील मालपूर येथे 33-11 क्षमतेचे वीज उपकेंद्र गेल्या वर्षभरापासून मंजूर आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीच्या कारभारामुळे ते अजून कार्यान्वित होताना दिसून येत नाही. याचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर चिंता दिसून येत आहे.मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड व पेरणी पूर्ण झाली असून या पिकांना आता पाणी देण्याची गरज येऊन ठेपली आहे. रब्बीतील पीक हे विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून असतात, यासाठी अखंडित व पूर्ण दाबाने वीज आवश्यक आहे, मात्र येथे उपकेंद्र नसल्यामुळे दोंडाईचा येथून विजेचा पुरवठा केला जातो.दोंडाईचा येथून 20 कि.मी. दूर्पयत हा विजेचा पुरवठा होतो. ज्या विद्युत तारेतून पुरवठा होत असतो त्या खूप जुन्या व जीर्ण झाल्यामुळे तारा तुटून तांत्रिक बिघाड हा सतत होत असल्यामुळे मालपूर येथील मंजूर उपकेंद्र त्वरित कार्यान्वित होणे गरजेचे झाले आहे. झालेला तांत्रिक बिघाड शोधण्यासाठीदेखील खूप वेळ लागतो. यातच कधीकधी तर दिवस जातो. यामुळे शेती पिकांचेदेखील नुकसान होत आहे. तसेच 132 केव्ही दोंडाईचा येथून हा पुरवठा होतो. अंतर जास्त असल्यामुळे तसेच इतर गावांना देखील येथूनच वीजपुरवठा होत असतो. यामुळे विजेला पूर्ण दाब राहत नाही व शेतक:यांच्या यामुळे विद्युत मोटारीदेखील फिरत नसल्यामुळे हे उपकेंद्र त्वरित होणे आवश्यक आहे.आधीच खरिपात या परिसरातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मोडून पडला आहे, आता संपूर्ण आशा रब्बीवर टिकून आहेत.