शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

घोषणांची अंमलबजावणी तात्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:51 IST

आमदार जयकुमार रावल यांची शासनाकडे मागणी

दोंडाईचा : नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केली आहे़राज्यात तीन पक्षांचे मिळून तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांचा पुर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता मिळाल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली़ त्यात अनेक अटी घातल्या. त्यात दोन लाखांपर्यंतच्या कर्ज माफीची प्रक्रिया मोठा गाजावाजा करून सुरूही झाली. तसेच हिवाळी अधिवेशनात नियमित कर्ज भरणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान व २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाºया खातेदारांनाही कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेची अंमलबजावणी मात्र अजून झालेली नाही़ त्याची अंमबजावणी व्हावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली आहे.सत्तेत येण्यापूर्वी आताचे सत्ताधारी असलेल्या तिनही पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी करण्याचे अनेक वेळा आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपला शब्द फिरविला आहे. त्यांनी दिलेल्या कर्जमाफी योजनेत जे शेतकरी नियमित कर्जाची रक्कम भरतात व ज्यांची कर्जाची रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त आहे अश्या शेतकºयांना वगळण्यात आले. मात्र जनतेचा रोष समोर आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात या शेतकºयांनाही प्रोत्साहनपर अनुदान व कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु सहा महिने उलटूनही त्याबाबतचा अध्यादेश अजून पर्यंत काढण्यात आलेला नाही. आता संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. सर्वत्र बंद असताना जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र आपला जीव धोक्यात टाकून अन्न पुरविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या फळ व भाजीपाला पिकविणारे शेतकºयांना कवडीमोल भावाने आपले उत्त्पन्न विक्री करावे लागत आहे. कापूस व धान्य घरात पडून आहे. त्यामुळे शेतकºयांची अर्थव्यवस्था पुर्णत: कोलमडली असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. खरीप हंगाम नजीक आलेला आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून या संकटकाळात शेतकºयांना दिलासा द्यावा अशीही मागणी आ. रावल यांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे