शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

घोषणांची अंमलबजावणी तात्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:51 IST

आमदार जयकुमार रावल यांची शासनाकडे मागणी

दोंडाईचा : नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केली आहे़राज्यात तीन पक्षांचे मिळून तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांचा पुर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता मिळाल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली़ त्यात अनेक अटी घातल्या. त्यात दोन लाखांपर्यंतच्या कर्ज माफीची प्रक्रिया मोठा गाजावाजा करून सुरूही झाली. तसेच हिवाळी अधिवेशनात नियमित कर्ज भरणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान व २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाºया खातेदारांनाही कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेची अंमलबजावणी मात्र अजून झालेली नाही़ त्याची अंमबजावणी व्हावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली आहे.सत्तेत येण्यापूर्वी आताचे सत्ताधारी असलेल्या तिनही पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी करण्याचे अनेक वेळा आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपला शब्द फिरविला आहे. त्यांनी दिलेल्या कर्जमाफी योजनेत जे शेतकरी नियमित कर्जाची रक्कम भरतात व ज्यांची कर्जाची रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त आहे अश्या शेतकºयांना वगळण्यात आले. मात्र जनतेचा रोष समोर आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात या शेतकºयांनाही प्रोत्साहनपर अनुदान व कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु सहा महिने उलटूनही त्याबाबतचा अध्यादेश अजून पर्यंत काढण्यात आलेला नाही. आता संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. सर्वत्र बंद असताना जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र आपला जीव धोक्यात टाकून अन्न पुरविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या फळ व भाजीपाला पिकविणारे शेतकºयांना कवडीमोल भावाने आपले उत्त्पन्न विक्री करावे लागत आहे. कापूस व धान्य घरात पडून आहे. त्यामुळे शेतकºयांची अर्थव्यवस्था पुर्णत: कोलमडली असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. खरीप हंगाम नजीक आलेला आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून या संकटकाळात शेतकºयांना दिलासा द्यावा अशीही मागणी आ. रावल यांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे