शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

घोषणांची अंमलबजावणी तात्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:51 IST

आमदार जयकुमार रावल यांची शासनाकडे मागणी

दोंडाईचा : नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केली आहे़राज्यात तीन पक्षांचे मिळून तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांचा पुर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता मिळाल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली़ त्यात अनेक अटी घातल्या. त्यात दोन लाखांपर्यंतच्या कर्ज माफीची प्रक्रिया मोठा गाजावाजा करून सुरूही झाली. तसेच हिवाळी अधिवेशनात नियमित कर्ज भरणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान व २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाºया खातेदारांनाही कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेची अंमलबजावणी मात्र अजून झालेली नाही़ त्याची अंमबजावणी व्हावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली आहे.सत्तेत येण्यापूर्वी आताचे सत्ताधारी असलेल्या तिनही पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी करण्याचे अनेक वेळा आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपला शब्द फिरविला आहे. त्यांनी दिलेल्या कर्जमाफी योजनेत जे शेतकरी नियमित कर्जाची रक्कम भरतात व ज्यांची कर्जाची रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त आहे अश्या शेतकºयांना वगळण्यात आले. मात्र जनतेचा रोष समोर आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात या शेतकºयांनाही प्रोत्साहनपर अनुदान व कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु सहा महिने उलटूनही त्याबाबतचा अध्यादेश अजून पर्यंत काढण्यात आलेला नाही. आता संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. सर्वत्र बंद असताना जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र आपला जीव धोक्यात टाकून अन्न पुरविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या फळ व भाजीपाला पिकविणारे शेतकºयांना कवडीमोल भावाने आपले उत्त्पन्न विक्री करावे लागत आहे. कापूस व धान्य घरात पडून आहे. त्यामुळे शेतकºयांची अर्थव्यवस्था पुर्णत: कोलमडली असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. खरीप हंगाम नजीक आलेला आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून या संकटकाळात शेतकºयांना दिलासा द्यावा अशीही मागणी आ. रावल यांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे