शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

विजेच्या लंपडावामुळे शेतकरी हतबल, कपाशी पिकाला पाणी कसे देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

कृषी विभागाने 1 जूननंतर बागायती कापूस लागवड करण्याची शिफारस केली आहे. मात्र, एक तारखेनंतर कर्ले एजीचा विद्युत पुरवठा हा ...

कृषी विभागाने 1 जूननंतर बागायती कापूस लागवड करण्याची शिफारस केली आहे. मात्र, एक तारखेनंतर कर्ले एजीचा विद्युत पुरवठा हा रात्री पाळीचा होणार आहे. रात्री वीजपुरवठा खंडित झाला तर कोणीच दखल घेत नाही. रात्रभर खंडित असतो यामुळे येथील शेतकऱ्यांनी २५ मेपासून दिवस पाळीतच कापूस लागवडीस पसंती दिली आहे. मात्र, दिवसादेखील लाईट व्यवस्थित चालत नसल्याने वीजपुरवठा तासनतास खंडित असतो. कंपनीने पावसाळ्यापूर्वी सर्व पोल टू पोल पेट्रोलिंग करून एकदाचा चोर फाॅल्ट शोधून अखंडित वीजपुरवठा करावा आणि कायमस्वरूपी समस्या मार्गी लावावी; परंतु तसे होताना दिसून येत नाही.

रबी हंगामापाठोपाठ आता खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या व खंडित वीजपुरवठ्यामळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. लागवड केलेल्या कापसाला जास्त दिवस झाले तर जमिनीतील किडेच कापसाचे बियाणे फस्त करतील. यामुळे विहिरी व कूपनलिकामधील पाणी काय कामाचे, पाणी असून विजेअभावी पाणी देता येत नसल्यामुळे हे महावितरण निर्मित संकट आहे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील कनिष्ठ अभियंता, यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्ष जनमित्रासमवेत लाइनवर जाऊन वीजपुरवठा सुरळीत करावा. हवेचे कारण पुढे करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये.

कर्ले फिडरवरील कलवाडे शिवारात तर नेहमीच कमी दाबाने वीजपुरवठा होत असतो. यामुळे येथील कापूस लागवड धोक्यात सापडली आहे. शेतकरी दिवसभर रोहित्रावर फेऱ्या मारताना दिसून येत आहे. यामुळे एकदाचा तांत्रिक बिघाड शोधून दुरुस्त केला पाहिजे. येथील कैफियत मांडण्यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जातात तर तेथे साहेब राहत नाहीत. येथील कनिष्ठ अभियंता भ्रमणध्वनी उचलण्याची साधी तसदी घेत नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास मोर्चाचा येथील शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया....

मागील तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत चालत नाही. एकदाचा तांत्रिक बिघाड शोधून बिघाड दुरुस्त झाला पाहिजे. यामुळे नुकताच लागवड केलेला कापूस संकटात सापडला आहे. पाणी असून विजेअभावी पाणी देता येत नाही. तक्रारीची कोणी दखल घेत नाही. दिवसभर डीपीवर चकरा माराव्या लागतात. दिवसा वीजपुरवठा झाला म्हणून कापूस लागवड केली. रात्री बिघाड झाला तर रात्रभर लाइट येत नाही. एक-दोन तासांत भरणे होत नाही.

-नरेंद्र दामू खंडेराव,

शेतकरी, मालपूर, ता. शिंदखेडा