शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

विजेच्या लंपडावामुळे शेतकरी हतबल, कपाशी पिकाला पाणी कसे देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

कृषी विभागाने 1 जूननंतर बागायती कापूस लागवड करण्याची शिफारस केली आहे. मात्र, एक तारखेनंतर कर्ले एजीचा विद्युत पुरवठा हा ...

कृषी विभागाने 1 जूननंतर बागायती कापूस लागवड करण्याची शिफारस केली आहे. मात्र, एक तारखेनंतर कर्ले एजीचा विद्युत पुरवठा हा रात्री पाळीचा होणार आहे. रात्री वीजपुरवठा खंडित झाला तर कोणीच दखल घेत नाही. रात्रभर खंडित असतो यामुळे येथील शेतकऱ्यांनी २५ मेपासून दिवस पाळीतच कापूस लागवडीस पसंती दिली आहे. मात्र, दिवसादेखील लाईट व्यवस्थित चालत नसल्याने वीजपुरवठा तासनतास खंडित असतो. कंपनीने पावसाळ्यापूर्वी सर्व पोल टू पोल पेट्रोलिंग करून एकदाचा चोर फाॅल्ट शोधून अखंडित वीजपुरवठा करावा आणि कायमस्वरूपी समस्या मार्गी लावावी; परंतु तसे होताना दिसून येत नाही.

रबी हंगामापाठोपाठ आता खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या व खंडित वीजपुरवठ्यामळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. लागवड केलेल्या कापसाला जास्त दिवस झाले तर जमिनीतील किडेच कापसाचे बियाणे फस्त करतील. यामुळे विहिरी व कूपनलिकामधील पाणी काय कामाचे, पाणी असून विजेअभावी पाणी देता येत नसल्यामुळे हे महावितरण निर्मित संकट आहे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील कनिष्ठ अभियंता, यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्ष जनमित्रासमवेत लाइनवर जाऊन वीजपुरवठा सुरळीत करावा. हवेचे कारण पुढे करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये.

कर्ले फिडरवरील कलवाडे शिवारात तर नेहमीच कमी दाबाने वीजपुरवठा होत असतो. यामुळे येथील कापूस लागवड धोक्यात सापडली आहे. शेतकरी दिवसभर रोहित्रावर फेऱ्या मारताना दिसून येत आहे. यामुळे एकदाचा तांत्रिक बिघाड शोधून दुरुस्त केला पाहिजे. येथील कैफियत मांडण्यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जातात तर तेथे साहेब राहत नाहीत. येथील कनिष्ठ अभियंता भ्रमणध्वनी उचलण्याची साधी तसदी घेत नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास मोर्चाचा येथील शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया....

मागील तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत चालत नाही. एकदाचा तांत्रिक बिघाड शोधून बिघाड दुरुस्त झाला पाहिजे. यामुळे नुकताच लागवड केलेला कापूस संकटात सापडला आहे. पाणी असून विजेअभावी पाणी देता येत नाही. तक्रारीची कोणी दखल घेत नाही. दिवसभर डीपीवर चकरा माराव्या लागतात. दिवसा वीजपुरवठा झाला म्हणून कापूस लागवड केली. रात्री बिघाड झाला तर रात्रभर लाइट येत नाही. एक-दोन तासांत भरणे होत नाही.

-नरेंद्र दामू खंडेराव,

शेतकरी, मालपूर, ता. शिंदखेडा