शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लंपडावामुळे शेतकरी हतबल, कपाशी पिकाला पाणी कसे देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

कृषी विभागाने 1 जूननंतर बागायती कापूस लागवड करण्याची शिफारस केली आहे. मात्र, एक तारखेनंतर कर्ले एजीचा विद्युत पुरवठा हा ...

कृषी विभागाने 1 जूननंतर बागायती कापूस लागवड करण्याची शिफारस केली आहे. मात्र, एक तारखेनंतर कर्ले एजीचा विद्युत पुरवठा हा रात्री पाळीचा होणार आहे. रात्री वीजपुरवठा खंडित झाला तर कोणीच दखल घेत नाही. रात्रभर खंडित असतो यामुळे येथील शेतकऱ्यांनी २५ मेपासून दिवस पाळीतच कापूस लागवडीस पसंती दिली आहे. मात्र, दिवसादेखील लाईट व्यवस्थित चालत नसल्याने वीजपुरवठा तासनतास खंडित असतो. कंपनीने पावसाळ्यापूर्वी सर्व पोल टू पोल पेट्रोलिंग करून एकदाचा चोर फाॅल्ट शोधून अखंडित वीजपुरवठा करावा आणि कायमस्वरूपी समस्या मार्गी लावावी; परंतु तसे होताना दिसून येत नाही.

रबी हंगामापाठोपाठ आता खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या व खंडित वीजपुरवठ्यामळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. लागवड केलेल्या कापसाला जास्त दिवस झाले तर जमिनीतील किडेच कापसाचे बियाणे फस्त करतील. यामुळे विहिरी व कूपनलिकामधील पाणी काय कामाचे, पाणी असून विजेअभावी पाणी देता येत नसल्यामुळे हे महावितरण निर्मित संकट आहे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील कनिष्ठ अभियंता, यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्ष जनमित्रासमवेत लाइनवर जाऊन वीजपुरवठा सुरळीत करावा. हवेचे कारण पुढे करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये.

कर्ले फिडरवरील कलवाडे शिवारात तर नेहमीच कमी दाबाने वीजपुरवठा होत असतो. यामुळे येथील कापूस लागवड धोक्यात सापडली आहे. शेतकरी दिवसभर रोहित्रावर फेऱ्या मारताना दिसून येत आहे. यामुळे एकदाचा तांत्रिक बिघाड शोधून दुरुस्त केला पाहिजे. येथील कैफियत मांडण्यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जातात तर तेथे साहेब राहत नाहीत. येथील कनिष्ठ अभियंता भ्रमणध्वनी उचलण्याची साधी तसदी घेत नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास मोर्चाचा येथील शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया....

मागील तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत चालत नाही. एकदाचा तांत्रिक बिघाड शोधून बिघाड दुरुस्त झाला पाहिजे. यामुळे नुकताच लागवड केलेला कापूस संकटात सापडला आहे. पाणी असून विजेअभावी पाणी देता येत नाही. तक्रारीची कोणी दखल घेत नाही. दिवसभर डीपीवर चकरा माराव्या लागतात. दिवसा वीजपुरवठा झाला म्हणून कापूस लागवड केली. रात्री बिघाड झाला तर रात्रभर लाइट येत नाही. एक-दोन तासांत भरणे होत नाही.

-नरेंद्र दामू खंडेराव,

शेतकरी, मालपूर, ता. शिंदखेडा