शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बेघरांना घरकुलांची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या ८७६ घरकुलांच्या वाटपाची अद्यापही प्रतीक्षा लागून आहे. घरकुलांचे काम जवळपास पूर्ण झाले असून पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आतच त्यांचे वाटप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने लाभार्र्थींची यादी निश्चित करताना काही निकष ठरविले आहेत.        नंदुरबारातील बेघर लोकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी दीड ...

ठळक मुद्देलाभार्र्थींची निवड करून वाटप करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या ८७६ घरकुलांच्या वाटपाची अद्यापही प्रतीक्षा लागून आहे. घरकुलांचे काम जवळपास पूर्ण झाले असून पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आतच त्यांचे वाटप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने लाभार्र्थींची यादी निश्चित करताना काही निकष ठरविले आहेत.        नंदुरबारातील बेघर लोकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी दीड हजार घरकुलांचा प्रस्ताव पालिकेने पाठविला होता. त्यापैकी ११७६ घरकुले बांधकाम प्रस्तावित होते. प्रत्यक्षात ८७६ घरकुलांना मंजुरी मिळून त्यासाठी अनुदान दाखल झाले होते. घरकुलांच्या बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने नंदुरबारातील जिल्हा रुग्णालयासमोरील जागा तसेच धुळे रस्त्यावरील भोणे फाट्यानजीकची जागा दिली होती. त्या ठिकाणी चार मजली इमारतीत घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु मध्यंतरी अर्थात दीड वर्षापूर्वी बेघर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अनेकांनी या घरांचा ताबा घेतला होता. त्यामुळे पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. पालिकेतर्फे यापूर्वी शहरातील फोटोपासधारक झोपडपट्टीवासीयांना घरकुलांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी तीन ते चार वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया कुटुंबाचे घर ज्या भागात असेल ती जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार होती. शिवाय लाभार्थी हिस्सा म्हणून १० ते १२ हजार रुपयेदेखील भरावे लागणार होते. त्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.घरकुलांचा ताबादीड वर्षापूर्वी जवळपास ८०० जणांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. बेघर संघर्ष समितीने आपल्या यादीनुसारच लाभार्र्थींची निवड करावी, अशी मागणी केली होती. परंतु पालिकेने काही नियम व अटी लक्षात घेऊन लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपल्याला घरकूल मिळणार नाही असा समज करून अनेकांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी अनेक कुटुंबे जवळपास वर्षभर राहिली होती. पालिकेने पोलीस बळाचा वापर करूनही संबंधित कुटुंबे घरातून बाहेर निघाली नव्हती. अखेर जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करीत आणि पालिकेने पात्र लाभार्र्थींनाच घरकुले दिली जातील असे जाहीर केल्यानंतर संबंधित कुटुंबे घरातून बाहेर निघाली आणि ताबा सोडला.काम पूर्णजवळपास एक वर्ष अनेक कुटुंबांनी या घरकुलांचा ताबा घेतलेला होता. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करता येत नव्हती. अखेर ताबा सोडल्यानंतर ठेकेदाराने तातडीने उर्वरित कामे पूर्ण केली. त्यात नळ फिटिंग, किचन, लाईट फिटिंग, रंगकाम आणि इतर कामांचा समावेश होता. ते आता पूर्ण करण्यात आले असून लवकरच ठेकेदार ही घरकुले पालिकेच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना...केंद्र सरकारने आता बेघरांसाठी नवीन योजना आणली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील बेघरांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात दारिद्र्यरेषेखालील, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील ज्यांच्या नावावर घर नाही अशा लोकांना या योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेतर्फे सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानुसार पालिका संबंधितांकडून अर्ज व आवश्यक कागदपत्रे घेऊन पात्र लाभार्र्थींची यादी शासनाला कळविणार आहे. त्यानंतर शासनाकडून संबंधित बँकांना आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्या त्या बँकेकडून लाभार्थी निश्चित होऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल.