शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 21:37 IST

उशिराने कामावर पोहचतात कर्मचारी । दवाखान्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

कापडणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला असून गैरहजर कर्मचाऱ्यांच्या रजेच्या अर्जावर रजा मंजूर म्हणून मुख्य डॉक्टरांची स्वाक्षरी नसणे, कर्मचारी बºयाच उशिराने कामावर पोहोचतात, रुग्णांच्या खाटाजवळ इलेक्ट्रिक साहित्यांचा खच पडलेला असतो. अशा विविध समस्यांमध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अडकले आहे.आरोग्य केंद्रास सकाळी नऊ वाजता आरोग्य केंद्रात भेट दिली असता त्यावेळेनंतर साडेनऊ वाजेपर्यंत अनेक कर्मचारी वेळेवर पोहोचलेले नव्हते. दवाखान्यातील आंतररुग्ण विभागात संततीचे आॅपरेशन झालेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी तक्रारींचा पाढा वाचला.दवाखान्यातील अत्यंत किंमती सौर ऊर्जा पॅनलवरती अस्ताव्यस्त खराटे ठेवलेले होत. आंतररुग्ण विभागासमोरील स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ दिसून आले. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारीही केल्या.येथील बाथरूममध्ये वृक्ष ठेवण्यात आले आहेत. रुग्णांच्या पलंगावर अस्ताव्यस्त पडलेले कपडे व दवाखान्यात कोठेहीही अस्ताव्यस्त ठेवलेले मोठ्या स्वरूपाचे इलेक्ट्रिक वस्तू फिटिंगच्या पट्ट्या अत्यंत बेसिस्तपणे ठेवलेल्या होत्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य दवाखान्यात दिसून येत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात अनावश्यक फेकलेला फलक पडून होता. अधिकाºयांच्या खुर्च्यांचे कव्हर फाटलेले आहे.शस्त्रक्रिया गृहाच्या मागील बाजूस प्रचंड घाणीचे व अस्वच्छतेचे वातावरण तसेच या दालनाच्या मागील बाजूचे बांधकाम जीर्ण व तुटलेले आहे. येथीलच रिकाम्या पडलेल्या हौदात दवाखान्यातील अनावश्यक फेकलेले साहित्य व केअर कचरा पडलेला आहे. दवाखान्यातील आस्थापना प्रशासन विभाग बंद आहे. प्रयोगशाळेचे दालन सकाळी साडेनऊ वाजता उशीरा येणाºया कर्मचाºयाने उघडले. हिरकणी कक्ष व इंजेक्शन रूमजवळ अत्यंत अस्वच्छ स्वरूपाचे व कुलर ठेवलेले होते. आंतररुग्ण विभागासमोर पत्र्याच्या छताला मोठ्या स्वरूपात जळमटे लागलेले आहे.एकच डॉक्टर असल्यामुळे रुग्णांचे अक्षरश: तपासणीसाठी रांगा लागतात. प्रतिनिधीने डॉक्टर लोहार यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, दवाखान्यात मस्टर वरती एकूण १७ कर्मचारी आहेत पैकी पाच कर्मचारी अनुपस्थित होते. मुख्य वैद्यकीय अधिकारी विजयंता नागे या नाशिकला ट्रेनिंगला गेले आहेत व बायोमेट्रिक प्रणाली कर्मचाºयांची थम हजेरी प्रक्रिया बंद असून दवाखान्यातील काही महत्त्वाचे औषधेही संपली आहेत, अशी माहिती डॉक्टर लोहार यांनी दिली आहे.