शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शेतात केलेले कष्ट कोरोनाच्या लढाईत आले कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST

धुळे : कोरोना शरीरासोबतच मनाचीही परीक्षा घेतो आहे. कोरोना विरूद्धची लढाई जिंकण्यासाठी धैर्य आणि संयम महत्त्वाचा आहे. आयुष्यभर शेतात ...

धुळे : कोरोना शरीरासोबतच मनाचीही परीक्षा घेतो आहे. कोरोना विरूद्धची लढाई जिंकण्यासाठी धैर्य आणि संयम महत्त्वाचा आहे. आयुष्यभर शेतात कष्ट उपसल्यामुळे संयमाची परीक्षा नवीन नव्हती. त्यामुळेच कोरोनावर मात करू शकलो, अशी भावना शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथील ६४ वर्षीय खंडू उत्तम पाटील यांनी व्यक्त केली.

खंडू पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर १७ एप्रिल रोजी ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आयुष्यभर शेतात राबल्याने, कष्ट करण्याची सवय असल्याने त्यांची इच्छाशक्ती चांगली होती तसेच चांगले उपचार मिळाल्याने ते लवकर बरे होऊ शकले, अशी माहिती खंडू पाटील यांचे चिरंजीव मनोज यांनी दिली.

खंडू पाटील यांना कोरोनाचा संसर्ग नेमका कसा झाला, ते समजले नाही. मात्र, सलग चार ते पाच दिवस खोकला व ताप येत होता. त्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. मात्र, खोकला कमी होत नसल्याने त्यांनी कोरोना चाचणीचा निर्णय घेतला. ९ एप्रिल रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

सिटी स्कॅनचा स्कोर होता नऊ -

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सिटीस्कॅन केले असता, त्यांचा स्कोर नऊ इतका होता, तसेच ऑक्सिजनची पातळी ९३ पर्यंत खाली आली होती, तसेच त्यांना अस्थमा असल्याने धोका जास्त होता. मात्र, तत्काळ उपचारांना सुरुवात केल्याने व औषधे उपलब्ध झाल्याने कोरोनावर विजय मिळवण्यात ते यशस्वी झाले.

समाजाचा दृष्टिकोन महत्त्वाचा -

कोरोनाविरुद्धच्या लढाईत समाजाचा रुग्णाबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे, ते महत्त्वाचे असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. कठीण काळात परिवाराने धीर दिल्याने वडिलांची प्रकृती लवकर सुधारण्यास मदत झाली. आजारपणात असताना रुग्णाशी इतर लोक कसे वागतात, ते जास्त महत्त्वाचे असते. कोरोना हा वेगळा आजार नाही, अशा पद्धतीने वागलो तर रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते, असेही त्यांनी सांगितले.

खासगी नव्हे, जिल्हा रुग्णालयात मिळाले इंजेक्शन -

खंडू पाटील यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी रेमडेसिविर व अन्य औषधांची गरज असून, ते आणण्यास रुग्णालयाकडून सांगण्यात आले. इंजेक्शनसाठी खूप धावाधाव केल्यानंतरही ते मिळत नसल्याने मनोज हतबल झाले होते. शेवटी त्यांनी साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालय गाठले व तेथील डॉक्टरांसमोर आपली कैफियत मांडली. जिल्हा शल्य चिकित्सक महेश भडांगे, आरोग्य अधिकारी अश्विनी भामरे यांनी पुरेसे औषध उपलब्ध असून, रुग्णाला घेऊन येण्यास सांगितले. खासगी रुग्णालयापेक्षाही अधिक चांगली सेवा जिल्हा रुग्णालयात मिळाल्याचे त्यांनी सांगितले.