शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

ज्ञानदानातून आपल्यातील राष्टभिमान जागृत करणारा गुरू असतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:58 IST

हर्षल विभांडीक : गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून गुरूंविषयी भावना केल्या व्यक्त; जीवनातील अनेक मूल्यांची शिकवण; प्रसंगी शिक्षाही करतात

सुरेश विसपुते । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून आपणास इतिहासाची माहिती, घटनाक्रम, ऐतिहासिक व्यक्ती इत्यादींची माहिती मिळते. परंतु त्या ज्ञानातून आपल्यातील राष्टभिमान जागृत करणारा गुरू असतो. आपण स्वत:साठी  जगायचे नसते तर राष्टÑासाठी जगायचे असते, हा व्यापक विचार गुरू आपल्याला देतात, अशा शब्दांत डिजिटल शाळेचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी गुरूंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवितात. आणि ती कृतीत यावीत, यासाठी आवश्यक त्या वेळी शिक्षासुद्धा करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो. काही विद्यार्थी शिक्षकांची चेष्टा करतात, हे अयोग्य आहे. आपण गुरूपौर्णिमेच्या दिवशी त्यांची क्षमा मागून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असेही त्यांनी प्रांजळपणे नमूद केले.  ज्ञानाची शक्ती शिष्याच्या क्षमतेपेक्षा भिन्न असते. अशी ही शक्ती तत्काळ एकाच वेळी शिष्यात आली तर शिष्यासाठी ती घातक ठरू शकते. अशावेळी गुरूंच्या शक्तीची आवश्यकता भासते. मला नेहमीच विचारले जाते की, शाळेत डिजिटल वर्ग झाला म्हणजे विद्यार्थी आपले शिक्षण स्वत:च का नाही करू शकत? डिजिटल वर्गात शिक्षण घेण्यासाठी शिक्षकाची काय आवश्यकता? अशा या प्रश्नांनी व विचारांनी मला शिक्षक म्हणजेच गुरूंबाबत लिहावयास प्रेरीत केले. गुरू म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की, विद्यार्थी एक थंडगार दगडासारखा आणि ज्ञान उकळत्या पाण्यासारखे आहे. हे असे उकळणारे पाणी आपण थेट एखाद्या थंडगार दगडावर ओतले तर ज्ञानाच्या शक्तीने आणि तापमानाच्या परिवर्तनाने त्यास तडा जाऊन तो खंडीत होऊ शकतो. गुरू ती शक्ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यात सक्षम असते व स्वत:च्या या ज्ञानाच्या तापाला शिष्याच्या स्तरावर आणू शकते. अर्थात थंडगार दगडावर उकळते पाणी ओतण्यापेक्षा, त्या पाण्याचे तापमान सर्वप्रथम कमी करून मग थेंब थेंब करून हे पाणी त्या दगडावर सोडते. म्हणजे त्या दगडाला तडा न जाता त्या दगडाचे तापमान वाढू लागते. आणि विद्यार्थी त्या गरम पाण्याप्रमाणे तापू लागतो आणि स्वत: गुरूपदाला जाऊन पोहचतो, असेही ते म्हणाले. वर्तमान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तके, संगणक, शिकवण्या अशा विविध माध्यमांद्वारे कोणत्याही विषयाची माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गुगल आणि विकीपिडीया हे आपल्याला एका ‘क्लिक’नेच एखाद्या विषयाची सखोल माहिती उपलब्ध करून देतात. परंतु विद्यार्थ्याचे अज्ञान घालवून, त्याची शैक्षणिक, अध्यात्मिक आणि शारीरिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरू असे म्हणतात, असे स्पष्ट करून विभांडीक यांनी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

गुरूंमुळेच सामाजिक प्रकल्प राबवू शकलो

माझ्या आयुष्यात शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक जीवनात अहमदाबाद व अमेरिकेतील न्यू यॉर्क या शहरांमध्ये नोकरी करताना मला विविध शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ज्यातून माझ्या जीवनाला दिशा मिळण्यास मदत झाली. आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही माझ्या जीवनशैलीत दिसून येईल. गेल्या चार वर्षांत मला डिजिटल शाळा उपक्रम आणि स्टार्ट अप धुळे उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. ते सर्व यशस्वीपणे राबविताना माझे गुरू प्रकाश पाठक यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, कोणताही निर्णय घेण्याआधी लागणारी पूर्वतयारी, माझी वैचारिक आणि अध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांनी माझ्याकडून करवून घेतलेल्या गोष्टी आणि माझ्या धाडसी निर्णयांमध्ये वेळोवेळी माझ्या परिवाराची घातलेली समजूत यामुळेच विविध सामाजिक उपक्रम मी यशस्वीरीत्या राबवू शकलो, असेही हर्षल विभांडीक यांनी आवर्जून नमूद केले. 

टॅग्स :Dhuleधुळे