शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

गावात गटारी तुंबल्या, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

कोरोनामुळे मालपूर अगोदरच हाॅटस्पाट बनले होते. मात्र, हळूहळू लाट ओसरू लागली आहे. यामुळे थोडा दिलासा मिळाला. यातच दुसरीकडे ...

कोरोनामुळे मालपूर अगोदरच हाॅटस्पाट बनले होते. मात्र, हळूहळू लाट ओसरू लागली आहे. यामुळे थोडा दिलासा मिळाला. यातच दुसरीकडे गावातील काही बालकांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावरून पालक वर्गात चर्चा आहे. गावात गटारीत पाणी ठिकठिकाणी साचलेले आहे. यामुळे डेंग्यू व इतर आजार वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गावाच्या पश्चिम दरवाजा असलेला घाटावर तर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथून जाणे-येणे अप्रत्यक्ष बंद झाले आहे. हा गावाचा जुना मार्ग असून आजही गावकऱ्यांची येथे मोठी वर्दळ असते. अंत्यसंस्कार करून आल्यानंतर वाॅर्ड क्रमांक दोन व तीनमधील नागरिक या मार्गाने घराकडे परतत असतात. येथे सध्या चालणे देखील मुश्कील झाले आहे. प्रत्येक वाॅर्डातील गटारी तुडुंब भरलेल्या आहेत. यामुळे यातील पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यातच वाॅर्ड क्रमांक एकमधील कुंभार गल्ली तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटी परिसरातील गटारींची दयनीय अवस्था झाली असून येथे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाॅर्ड क्रमांक चारमधील अमरावती नदी किनारपट्टीवर देखील प्रचंड घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. वाॅर्ड क्रमांक चार व पाचच्या सीमारेषा गल्लीत तर दिवसरात्र या मार्गावरून गटारीतील पाणी वाहत असते. हा गावाचा मुख्य प्रमुख मार्ग आहे. या प्रमुख मार्गावरूनच गटारीतील पाणी सुमारे महिनाभरापासून वाहत असून, त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये जिल्हा परिषद शाळा कमांक तीन जवळपास व गल्लीतदेखील अशीच परिस्थिती दिसून येत आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने युद्धपातळीवर साफसफाई मोहीम हाती घेऊन गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मालपूरकरांची मागणी आहे.