शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण समिती प्रथमच स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:50 IST

: मालनगाव संघर्ष समितीने जेसीबी मशिन दिले उपलब्ध करून

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पंतप्रधान पीक विमा योजनेत समाविष्ट शेतकºयांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. सरकारने  या संदर्भात निर्णय घेतल्यानंतर देशात अशा पद्धतीने स्थापन झालेली ही पहिलीच समिती असल्याची माहिती अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी दिली. देशात पीक विमा योजना १९८४ पासून लागू करण्यात आली. त्यात वेळोवेळी शेतकºयांना फायदेशीर असे बदल करण्यात आले. खरीप हंमाम २०१६ पासून नवीन पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली. या योजनेतही शेतकºयांना फायदेशीर ठरतील, असे बदल करण्यात आले. या योजनेत केंद्र व राज्य अशी दोन्ही सरकारांकडून भरपूर अनुदान दिले जाते. मात्र तरीही शेतकºयांच्या योजनेविषयीच्या तक्रारी कमी होण्याऐवजी उलट वाढत आहेत. त्याची कारणे व उपाय पढावद, ता.शिंदखेडा येथील प्रगतीशील शेतकरी अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारला सूचविले होते. त्यातील काही सूचना केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनांत समाविष्ट केल्या आहेत. त्यात शेतकºयांची रास्त तक्रार असेल तर ती कोणापुढे मांडावी? तसेच तक्रार निवारणाचे अधिकार कोणालाही नसल्यानेही शेतकºयांना न्याय मिळत नव्हता. यामुळे त्यांच्या तक्रारी वाढल्या   होत्या. मात्र नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत तक्रार निवारण समिती  नेमावी. तसेच त्यात शेतकरी प्रतिनिधी असावेत, असा बदल करण्यात आला आहे. समितीकडे तक्रार दाखल त्यानुसार अ‍ॅड.पाटील यांनी  जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांना बेटावद महसूल मंडळातील शेतकºयांच्या तक्रारी सादर करून त्यांना तक्रार निवारण समितीमार्फत न्याय देण्याची विनंती केली. या संदर्भात जिल्हाधिकारी रेखावार यांनी बैठक बोलवून निर्णय घेतला की, विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्या प्रतिनिधींनी स्टेट बँक  शाखा बेटावद, पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद येथे आणि धुळे तालुक्यात प्रत्येकी एक दिवस जाऊन तक्रारींवर बँकेतच निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. रब्बीसाठी विमा हप्त्यांबाबत दक्षतेचे आदेश रब्बी पिकांसाठी यंदा विमा हप्ता भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. यंदा दुष्काळ असल्याने रब्बी हंगामाचा पीक विमा हप्ता शेतकºयांनी मुदतीत भरावा, यासाठी कृषी विभागाने कृषी सहायक व तलाठी यांनी प्रत्येक गावात ठरविलेल्या तारखेला जाऊन विमा फॉर्म, ७/१२ उतारा ,बँक खाते पासबुकची प्रत हे एकत्र घेऊन रोज ठरल्याप्रमाणे नियोजित विमा हप्ता बँकेत भरावा, असे आदेश दिले आहेत. दिलेल्या लक्षांकाप्रमाणे सर्व शेतकºयांचा विमा हप्ता भरला जावा याकरीता जिल्ह्यात विभाग करुन त्यावर एक अधिकारी नेमून त्याच्याकडून रोज अहवाल घ्यावा, असे आदेश दिलेत. पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये म्हणून दक्षता घेण्यासही सूचविले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे