शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील निर्यातदारांना उत्कृष्ट संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST

धुळे : जागतिकीकरणामुळे सर्व जग एक बाजारपेठ झाले आहे. शासनाचे विविध विभाग आणि निर्यातदारांच्या सहकार्याने धुळे जिल्हा निर्यातीत ...

धुळे : जागतिकीकरणामुळे सर्व जग एक बाजारपेठ झाले आहे. शासनाचे विविध विभाग आणि निर्यातदारांच्या सहकार्याने धुळे जिल्हा निर्यातीत चांगली कामगिरी करू शकतो. त्यांनी ही संधी साधत जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज सकाळी केंद्र सरकारचा वाणिज्य विभाग, राज्य शासनाचा उद्योग विभाग, विदेश व्यापार महानिदेशालय, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिल्ह्यातील निर्यातदार व औद्योगिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, उपसंचालक अमोल इंगळे, सहाय्यक आयुक्त के. डी. भामरे, निर्यात सल्लागार दिनेश देवरे, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चौधरी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक गोपाल सक्सेना, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एमआयडीसी अवधान शाखेचे व्यवस्थापक जोशी, विदेश व्यापार महानिदेशालय, मुंबईचे एफटीडीओ संजय धुपेस्कर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते उद्योग प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, जिल्हा निर्यातीत उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतो. या पार्श्वभूमीवर निर्यातदार, उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी, सूचना प्रशासनास कळवाव्यात. त्यांचा जिल्ह्याच्या कृती आराखड्यात समावेश करण्यात येईल तसेच निर्यातदार, औद्योगिक संघटनांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. महाव्यवस्थापक सांगळे यांनी जिल्ह्याच्या निर्यात कृती आराखड्याबाबत माहिती दिली. त्यासाठी निर्यातदार व औद्योगिक संघटनांनी सूचना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. सहाय्यक आयुक्त भामरे यांनी केंद्र, वस्तू व सेवाकर कायदा, केंद्रीय उत्पादन शुल्क करविषयक शासनाच्या योजना व सवलतींबाबत मार्गदर्शन केले. देवरे यांनी निर्यातीसाठीचे विविध टप्पे व प्रक्रिया, स्टेट बँक ऑफ इंडियाचे युगेश सामंत यांनी निर्यातीसाठी बँकेच्या विविध योजना, प्रा. तुषार पाटील यांनी वस्त्रोद्योग उत्पादनांसाठीच्या विविध संधी याविषयी, तसेच धुपेस्कर, उद्योग उपसंचालक इंगळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुभाष गिरासे, उद्योग निरीक्षक एस. टी. लासूरकर, एस. बी. ओझरकर, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी नवीन खंडारे, मिटकॉनचे प्रकल्प अधिकारी पी. टी. महाजन यांनी या संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. उपसंचालक इंगळे यांनी प्रास्ताविक केले. उद्योग निरीक्षक एन. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.