शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:52 IST

पावसामुळे अर्थचक्र बिघडले : आॅक्टोबरमध्ये ७७ हजार ६२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ७१५ गावे बाधित

शिरपूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेला आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे ७१५ गावातील अंदाजे ७७ हजार ६२५ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे़ सततच्या या स्थितीमुळे ‘लढतोय, पण कणा मोडतोय’ अशीच व्यथा बळीराजाकडून व्यक्त होत आहे़गेल्यावर्षी कमी पावसामुळे खरीप व रब्बी हंगाम शेतकºयांच्या पदरी पडला नव्हता़ त्यामुळे २०१९ मध्ये तरी वरूणराजा प्रसन्न होणार का, अशी विवंचना शेतकºयांना लागली होती़ तालुक्यात जून ते आॅगस्ट या तीन महिन्यापर्यंत पाऊस होवूनही धरणे कोरडीच होती़करवंद व अनेर मध्यम प्रकल्पात पाण्याचा अल्प साठा होता़ तसेच तालुक्यातील १३ पैकी ८ लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट होते़ त्यामुळे कोरडा दुष्काळाला सामोरे जाण्याची भिती वाटत होती़ मात्र आॅगस्ट महिन्याच्या मध्यावर पावसाने जोरदार हजेरी लावून कहरच केला़ आॅक्टोबर महिन्यात सर्व धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. पावसाला आता बास म्हणण्याची वेळ आलीय तरी देखील परतीच्या पावसाची जोरदार हजेरी सुरु आहे.परतीच्या पावसाने शहरासह तालुक्यात हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे़ पिक कापणीला आले असतांना अधिकच्या पावसामुळे त्यास झाडावरच कोंब फुटू लागले़ काढणीला आलेल्या ज्वारी, मका, बाजरी, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ त्यामुळे होत्याचे नव्हते झाल्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला़ कापसाचे उत्पन्न देखील आले नाही. बहुतांश शेतकºयांनी कपाशीवर केलेला फवारणी, खते, बियाणे यांचा खर्च देखील निघाला नसल्याचे सांगण्यात आले़सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या शेती पिके व फळपिकाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे़त्यात खरीप ज्वारी ४८१० हेक्टर, बाजरी ५६३५, मका ६९६५, भुईमूग २४०, सोयाबीन ९०२०, कापूस ३९७८०, भाजीपाला ६५, पपई ११० असे एकूण ७७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे़ खरीप २०१९ मधील एकूण पेरणी क्षेत्र १ लाख ११ हजार ४२२ हेक्टर पैकी ७७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे़ त्यात बाधित शेतकरी संख्या १ लाख ६ हजार ६७७ इतकी आहे़

टॅग्स :Dhuleधुळे