शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:52 IST

पावसामुळे अर्थचक्र बिघडले : आॅक्टोबरमध्ये ७७ हजार ६२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ७१५ गावे बाधित

शिरपूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेला आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे ७१५ गावातील अंदाजे ७७ हजार ६२५ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे़ सततच्या या स्थितीमुळे ‘लढतोय, पण कणा मोडतोय’ अशीच व्यथा बळीराजाकडून व्यक्त होत आहे़गेल्यावर्षी कमी पावसामुळे खरीप व रब्बी हंगाम शेतकºयांच्या पदरी पडला नव्हता़ त्यामुळे २०१९ मध्ये तरी वरूणराजा प्रसन्न होणार का, अशी विवंचना शेतकºयांना लागली होती़ तालुक्यात जून ते आॅगस्ट या तीन महिन्यापर्यंत पाऊस होवूनही धरणे कोरडीच होती़करवंद व अनेर मध्यम प्रकल्पात पाण्याचा अल्प साठा होता़ तसेच तालुक्यातील १३ पैकी ८ लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट होते़ त्यामुळे कोरडा दुष्काळाला सामोरे जाण्याची भिती वाटत होती़ मात्र आॅगस्ट महिन्याच्या मध्यावर पावसाने जोरदार हजेरी लावून कहरच केला़ आॅक्टोबर महिन्यात सर्व धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. पावसाला आता बास म्हणण्याची वेळ आलीय तरी देखील परतीच्या पावसाची जोरदार हजेरी सुरु आहे.परतीच्या पावसाने शहरासह तालुक्यात हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे़ पिक कापणीला आले असतांना अधिकच्या पावसामुळे त्यास झाडावरच कोंब फुटू लागले़ काढणीला आलेल्या ज्वारी, मका, बाजरी, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ त्यामुळे होत्याचे नव्हते झाल्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला़ कापसाचे उत्पन्न देखील आले नाही. बहुतांश शेतकºयांनी कपाशीवर केलेला फवारणी, खते, बियाणे यांचा खर्च देखील निघाला नसल्याचे सांगण्यात आले़सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या शेती पिके व फळपिकाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे़त्यात खरीप ज्वारी ४८१० हेक्टर, बाजरी ५६३५, मका ६९६५, भुईमूग २४०, सोयाबीन ९०२०, कापूस ३९७८०, भाजीपाला ६५, पपई ११० असे एकूण ७७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे़ खरीप २०१९ मधील एकूण पेरणी क्षेत्र १ लाख ११ हजार ४२२ हेक्टर पैकी ७७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे़ त्यात बाधित शेतकरी संख्या १ लाख ६ हजार ६७७ इतकी आहे़

टॅग्स :Dhuleधुळे