शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोनगीर येथील बाजारावर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:31 IST

पावसाच्या अभावाचा परिणाम : धुळे तालुक्यात भाज्यांच्या उत्पादनात घट, पाणीटंचाईनेही नागरिक त्रस्त

आॅनलाईन न्यूज नेटवर्कसोनगीर : सर्वत्र पावसाने हुलकावणी दिल्याने पाणी टंचाईसह दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरूवारी त्याचा परिणाम येथील आठवडे बाजारावरही दिसून आला. स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे गृहिणींचे ‘किचन बजेट’ पार कोलमडले. सध्या परिसरात विहिरींची जलपातळी खोल गेल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून अन्य ठिकाणांहून भाजीपाला येथे विक्रीसाठी येत आहे.सध्या वाल, शेवगा, टोमॅटो व कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. पाणीटंचाईमुळे दिवसेंदिवस भाजीपाल्यांचे भाव वाढत आहे. काही भाज्यांचे दर प्रतिकिलो १२० ते १३० रुपये तर काही भाज्या ७० ते ८० रुपय कि.ग्रॅ. दराने किरकोळ विक्री होत आहे. त्यात वाल, शेवगा, टोमॅटो प्रत्येकी १०० ते १२० रु. किलोच्या दराने विकली जात आहे. तर वांगी, कारली, भेंडी, दुधी भोपळा, गिलके, मेथी, पालक आदी भाज्या ७० ते ८० रुपये किलोच्या दराने विक्री केली जात आहे. कोथींबिर ही सर्वाधिक २८० ते ३०० रुपये किलो च्या दराने विक्री केली जात आहे. तर सध्या फक्त बटाटे स्वस्त म्हणजे २० रुपये कि.ग्रॅ.दराने विक्री होत आहेत.पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पातळी खालावल्याने तर काही विहिरी कोरड्या पडल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. पाऊस नसल्याचा थेट परिणाम भाजी व्यवसायावर दिसून येत आहे. किरकोळ दुकानदार व्यापाºयांकडून भाजीपाला माल विक्रीसाठी घेतात. मात्र भाव वाढल्याने भाजीपाला घेण्यासाठी ग्राहक तयार नाही. परिणामी भाजी सडत असल्याने ती फेकण्याशिवाय विक्रेत्याकडे पर्याय नसतो. यामुळे किरकोळ दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी १५० रुपयांत पिशवी भरून भाजीपाला येत होता. मात्र आता ३०० रुपय जरी बाजारात नेले तरी घरी एक रुपया शिल्लक येत नाही, असा अनुभव काहींना येत आहे. दरम्यान गेल्या दोन आठवड्यापासून भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिपाली जैन यांनी यांनी सांगितले.पाऊस नसल्याने तसेच विहिरी कोरडया पडल्याने स्थानिक शेतक?्याचा शेतात भाजी पाला पिकवला जात नाहीय. या मुळे सध्या येथील बाजार पेठेत अन्य ठिकाणा वरून भाजी पाला ठोक विक्रीसाठी येत आहे. गेल्या काही दिवसांपासुन भाजी पाल्याचे दर वधारल्याने गृहिणीची किचन बजेट पार कोलमंडले फक्त बटाट्याचे दर आवाक्यात आहेत. दरम्यान पावसाची अशीच परिस्थिती असली तर आगामी काळात कसे होणार, अशी चिंता नागरिक व्यक्त करीत आहेत.दरम्यान गुरुवारी येथे भरणाºया आठवडे बाजाराला परिसरातील २० ते २५ खेड्यापाड्यातील लोक बाजार करण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तसेच दुष्काळी परिस्थिती असल्याने दुपारच्या वेळेत बाजारात शुकशुकाट दिसून आला. गुरुवार असून देखील पाहिजे त्या प्रमाणात व्यवसाय होत नसल्याचे बºयाच व्यावसायिक, दुकानदारांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे