शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कृषी विकास दरात ५ टक्के वाढीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 09:38 IST

धुळे जिल्हा : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत कृषी विभागाची माहिती 

ठळक मुद्देअपेक्षित ५ टक्के विकासदरासाठी अन्नधान्य, भाजीपाला व फळपिकांची उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्टविविध पिकांसाठी ४८ हजार ९७० क्विंटल बियाणे, सुधारित व बिटी कापसाच्या ८.४० लाख पाकिटांची मागणीशेतक-यांना दर्जेदार कृषी निविष्ठा व सुरळीत कर्जवाटपाचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : यंदाच्या खरीप हंगामात कृषी विकासाचा दर ५ टक्क्याने वाढविण्यावर भर दिला असून त्यासाठी अन्नधान्य पिकांची उत्पादकता १० टक्के तर भाजीपाला, फळपिकांची उत्पादकता ७ टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती खरीप हंगाम पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत कृषी विभागातर्फे देण्यात आली. शेतक-यांना पीक कर्जाचा पतपुरवठा सुरळीत व वेळेवर होण्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याबरोबरच, शेतकरी खाजगी सावकाराकडे वळणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. दर्जेदार खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या.राज्याचे ग्राम विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात शनिवारी सकाळी ही बैठक पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, कृषी संचालक कार्यालयात नाशिक येथील सामेती प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, प्रांत गणेश मिसाळ, तंत्र अधिकारी विनय बोरसे, अमृत पवार आदी उपस्थित होते. बैठकीस  धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे एकमेव लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल व जिल्ह्यातील अन्य आमदार या बैठकीस अनुपस्थित होते.  यावेळी कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामाकरिता केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरंभी कृषी विभागाने तयार केलेल्या कापसावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन विषयक घडीपत्रिका, भित्तीपत्रिका व जलदर्शिका २०१८ चे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. गतवर्षी खरीप व रब्बी हंगाम मिळून १ हजार ८० कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र त्या तुलनेत केवळ २९३ कोटी २७ लाख रुपये पीक कर्जाचे वितरण झाले. त्याची टक्केवारी अवघी २७ टक्के आहे, अशी माहिती अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर यांनी दिली. त्यामुळे यंदा कृषी पीक कर्ज वाटपासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. हवामान खात्याने यावर्षी पावसाळा समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यंदा १ हजार १७६ कोटी रु. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतकºयांना विनासायास कर्ज कसे मिळेल, असे नियोजन करण्याचे तसेच ते त्यासाठी खासगी सावकारांकडे वळणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शासनामार्फत राबविण्यात येणा-या स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करून जनजागृती करावी, अशी सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केली.  शेतक-यांना देण्यात येणारे अर्थ सहाय्य हे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिकींग करून घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री भुसे यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश सांगळे यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. उपविभागीय कृषी अधिकारी पी.एम. सोनवणे यांनी आभार मानले. या बैठकीला कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ४.४० लाख हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट यंदा खरीप पेरणीसाठी ४.४० लाख हेक्टर क्षेत्राचे लक्षांक निश्चित केला आहे. प्रमुख पिकांखेरीज सरासरीच्या तुलनेत मका व सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. विविध पिकांच्या ४८ हजार ९७० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविली आहे. कापसाच्या सुधारित वाणाची १ कोटी ७५  लाख पाकिटे व बी.टी. कापसाच्या ६.६५ लाख पाकिटांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. १ लाख २ हजार ७१० मे.टन खत पुरवठ्याचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर असून मागील शिल्लक ८८४२ मे.टन साठ्यासह एकूण १ लाख ११ हजार ५५२ मे.टन खते खरीपासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली.

 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorतहसीलदार