शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माहेरची ओढ असलेल्या मुलींना सासरीच साजरी करावी लागणार आखाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

ग्रामीण भागात आजही अक्षय तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी अनेक कुटुंबामध्ये एकत्र पद्धती होती. त्यामुळे सासरी गेलेली मुलगी ...

ग्रामीण भागात आजही अक्षय तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी अनेक कुटुंबामध्ये एकत्र पद्धती होती. त्यामुळे सासरी गेलेली मुलगी दिवाळी व आखाजीला हमखास माहेरी येते. बदलत्या काळानुसार एकत्र कुटुंब पद्धती काही प्रमाणात कमी झालेली असली तरी सासरी गेलेली मुलगी आपल्या माहेरी आखाजीला हमखास जात असते. मात्र गेल्यावर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लावलेले असून, जिल्हाबंदीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या सासुरवाशिणींना यावर्षीही या सणाला आपल्या माहेरी येता येणार नाही.

दरम्यान ग्रामीण भागात या दिवशी पूर्वजांचे स्मरण करण्यात येते. ही परंपरा कायम राहणार आहे. आखाजीनिमित्त अनेक ठिकाणी झोके बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे झोके घेळण्याचा आनंदही अनेक महिला घेण्याची शक्यता आहे.दरम्यान या दिवशी अनेक ठिकाणी पत्त्यांचे डाव रंगत असतात. यातून लाखोंची उलाढाल होत असते. मात्र कोरोनाचे कडक निर्बंध असल्याने, यावर्षी पत्त्याचे डाव रंगण्याची शक्यता कमीच आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदीलाही प्राधान्य दिले जाते. मात्र आता सध्या सकाळी ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने, खरेदीवरही मर्यादा येईल. त्यामुळे बाजारातील उलाढालही कमी होण्याची शक्यता आहे.