शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

चौथ्या दिवसांपासून आरास भाविकांसाठी खुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:35 IST

आरास बघण्यासाठी होऊ लागली गर्दी   : मोजक्या मंडळांतर्फे सजीव आरास सादर करण्यावर भर, विविध विषयांवर प्रबोधन

धुळे :  शहरात सोमवारी अतिशय धुमधडाक्यात गणरायांचे आगमन झाल्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर सर्वच सार्वजनिक मंडळांची आरास पूर्ण झालेली आहे. चौथ्या दिवसापासून आरास बघण्यासाठी भाविकांची ठिकठिकाणी गर्दी होवू लागली आहे. सजीव आरास लक्षवेधक ठरू लागल्या आहेत. यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सर्वच  मंडळांतर्फे अगदी जल्लोषात ‘श्रीं’चे  स्वागत  करण्यात आले. परंतु गेल्या महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्तहानी झाली. त्यामुळे मोजक्या मंडळांनीच यावर्षी मोठ्या आरास सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरित मंडळांनी केवळ भव्य-दिव्य, आकर्षक  मूर्ती स्थापनेवरच भर देवून आरासवर होणारा खर्च टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान गणेश चतुर्थीपासून सुरवातीचे दोन दिवसात वरूणराजाने दमदार हजेरी लावल्याने, अनेक मंडळांना आपल्या आरास, अथवा सजावटीचे काम पूर्ण करता आले नव्हते. आरासचे काम सुरू केल्याबरोबर पावसाचे आगमन होत असल्याने, मंडळांच्या कार्यकर्त्यांना मूर्ती झाकणे, प्लॅस्टिकचा कागद आंथरणे, वीज पुरवठा बंद करणे आदी गोष्टी करतांना त्यांची दमछाक होत होती. परंतु बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने, मंडळाच्या कार्यकर्त्यांना राहिलेले काम पूर्ण करता आले. त्यामुळे अखेर तिसºया दिवशी आरासचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गुरूवारपासून आरास बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. अनेक मंडळांनी सजीव आरास सादर करण्यावरच सर्वाधिक भर दिलेला आहे. ज्या मंडळांनी केवळ मोठी मूर्ती स्थापन केली आहे, त्यांनीही आपल्या मंडळाच्या परिसरात  महापुरामुळे झालेले नुकसान,  बेटी-बचाओ-बेटी पढाओ, पाणी वाचवा, गड-किल्यांचे संरक्षण, संवर्धन करा आदी विषयांवर  समाज प्रबोधनाबरोबरच एक वेगळा संदेशही दिलेला आहे. रस्ते गर्दीने फुलू लागलेदरम्यान चौथ्या  दिवसांपासून गणेश मंडळांच्या आरास भाविकांसाठी खुल्या झाल्याने, आता रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. गणेश भक्तांमुळे गर्दी फुलू लागले आहे. मंडळांनी तयार केलेल्या आरासला भाविकांकडून दाद मिळू लागल्याने, कार्यकर्त्यांनाही समाधान वाटू लागले आहे. तसेच भल्या मोठ्या मूर्तीही लक्षवेधक ठरत आहेत. पावसाने उघडीप घेतल्यास अजून गर्दी होऊ शकेल.पुढील सहा-सात दिवस भाविकांना वेगवेगळ्या आरास बघायला मिळणार आहेत. भगवा चौक गणेश मंडळातर्फे सजीव आरास*शहरातील भगवा चौक गणेश मंडळातर्फे  ज्वलंत प्रश्नावर सजीव आरास सादर करण्यात येत आहे. यात सजीव आरासमधून शिक्षण, आरोग्य, मोबाईल, प्लॅस्टिकबंदी आदींवर जनजागृती करण्यात येत आहे. मोबाईल हा संपर्कासाठी प्रत्येकासाठी आवश्यक झालेला आहे. मात्र त्याचा अतिरेक झाला तर काय दुष्परिणाम होतात हे यातून दाखविण्यात आले आहे. तर शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातलेली आहे. असे असतांनाही काहीजण प्लॅस्टिकचा वापर करतात. प्लॅस्टिकपासून होणारे दुष्परिणाम या सजीव आरासमधून दाखवित प्लॅस्टिकचा वापर टाळा असा संदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर शिक्षण किती महत्वाचे आहे हे देखील या सजीव आरासच्या माध्यमातून पटवून दिले आहे. आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे. *डी.के. डान्स गृपचे कार्यकर्ते ही जवळपास १० मिनिटांची सजीव व प्रबोधनपर आरास सादर करीत आहेत. यात दीपक साळुंके, तन्वी शर्मा, महेश माळी, नितीन वानखेडे, पवन भगत, प्रभाकर पाटील, भावेश अहिरराव, भूषण संसारे, अनिल सोनवणे, चेतन नेतकर या कलाकारांचा समावेश आहे. *भगवा चौक गणेश मंडळातर्फे दरवर्षीच समाज प्रबोधनपर आरास सादर करण्यात येत असते. मंडळाचे हे १८ वे वर्ष आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भुपेंद्र लहामगे, संजय गुजराथी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पंकज गोरे हे आहेत. मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष सुरेश जडे, उपाध्यक्ष राम परदेशी, कुणाल मराठे, स्वागताध्यक्ष सुहास शिर्के व अनेक सदस्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Dhuleधुळे