शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात चार लाखांच्या मदतीचा मेसेज व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST

सुनील बैसाणे धुळे : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांची मदत मिळणार असल्याचा मेसेज आजही सोशल मीडियावरुन व्हायरल ...

सुनील बैसाणे

धुळे : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांची मदत मिळणार असल्याचा मेसेज आजही सोशल मीडियावरुन व्हायरल होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १४ मार्च २०२० रोजी एक परिपत्रक काढून मृतांच्या वारसांना ४ लाख रुपयांचे अर्थसहाय देण्याचे जाहीर केले होते, परंतु केंद्र शासनाने त्याच दिवशी दुसरे परिपत्रक काढून पहिले परिपत्रक मागे घेत कोरोनाग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली.

केंद्र शासनाने अर्थसहाय्याचा निर्णय घेतल्यावर त्याच दिवशी नेटकऱ्यांनी जनजागृतीसाठी सोशल मीडियावरुन हा मेसेज टाकला. परंतु निर्णय मागे घेतल्याचा मेसेज आला नाही. त्यामुळे पहिला मेसेज आजही सोशल मीडियावरुन व्हायरल होत असल्याने तो बनावट ठरला आहे. परंतु मेसेज वाचून नागरिक प्रशासनाचे आणि दवाखान्यांचे उंबरठे झिझवत आहेत. प्रशासनासह नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण अशी कोणतीही योजना नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मृतांचे नातेवाईकच नव्हे तर खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखो रुपये खर्च करणारे रुग्ण देखील अशा लावून बसले आहेत. त्यांनी देखील अर्ज करण्यासाठी खटाटोप केला होता, परंतु साऱ्यांच्या आशा फोल ठरल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शेकडो अर्ज

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शेकडो जण अर्ज करण्यासाठी आले. परंतु सदरचे अर्ज संबंधित रुग्णालयांच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या कक्षात जमा करण्याचे सांगण्यात आले. परंतु मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच दोन्ही विभागांनी अर्ज स्वीकारले नाहीत. परंतु काहीजण आपत्ती व्यवस्थापनकडे बळजबरीने अर्ज जमा करुन गेले आहेत. असे ७० पेक्षा अधिक अर्ज पडून आहेत.

या अर्जांचे काय करणार?

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आलेल्या अर्जांचे नेमके करायचे काय असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. परंतु मदतीचा मेसेज बनावट असल्याने हे अर्ज रद्दीतच पडून राहण्याची शक्यता आहे. सामान्यांना मात्र आशा लागली आहे.

अर्ज करु नका, अशी कुठलीही योजना नाही!

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदतीची कोणतीही योजना नाही. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करु नये किंवा प्रशासनाकडे तगादा लावू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.