शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोनात चार लाखांच्या मदतीचा मेसेज व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST

सुनील बैसाणे धुळे : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांची मदत मिळणार असल्याचा मेसेज आजही सोशल मीडियावरुन व्हायरल ...

सुनील बैसाणे

धुळे : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांची मदत मिळणार असल्याचा मेसेज आजही सोशल मीडियावरुन व्हायरल होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १४ मार्च २०२० रोजी एक परिपत्रक काढून मृतांच्या वारसांना ४ लाख रुपयांचे अर्थसहाय देण्याचे जाहीर केले होते, परंतु केंद्र शासनाने त्याच दिवशी दुसरे परिपत्रक काढून पहिले परिपत्रक मागे घेत कोरोनाग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली.

केंद्र शासनाने अर्थसहाय्याचा निर्णय घेतल्यावर त्याच दिवशी नेटकऱ्यांनी जनजागृतीसाठी सोशल मीडियावरुन हा मेसेज टाकला. परंतु निर्णय मागे घेतल्याचा मेसेज आला नाही. त्यामुळे पहिला मेसेज आजही सोशल मीडियावरुन व्हायरल होत असल्याने तो बनावट ठरला आहे. परंतु मेसेज वाचून नागरिक प्रशासनाचे आणि दवाखान्यांचे उंबरठे झिझवत आहेत. प्रशासनासह नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण अशी कोणतीही योजना नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मृतांचे नातेवाईकच नव्हे तर खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखो रुपये खर्च करणारे रुग्ण देखील अशा लावून बसले आहेत. त्यांनी देखील अर्ज करण्यासाठी खटाटोप केला होता, परंतु साऱ्यांच्या आशा फोल ठरल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शेकडो अर्ज

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शेकडो जण अर्ज करण्यासाठी आले. परंतु सदरचे अर्ज संबंधित रुग्णालयांच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या कक्षात जमा करण्याचे सांगण्यात आले. परंतु मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच दोन्ही विभागांनी अर्ज स्वीकारले नाहीत. परंतु काहीजण आपत्ती व्यवस्थापनकडे बळजबरीने अर्ज जमा करुन गेले आहेत. असे ७० पेक्षा अधिक अर्ज पडून आहेत.

या अर्जांचे काय करणार?

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आलेल्या अर्जांचे नेमके करायचे काय असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. परंतु मदतीचा मेसेज बनावट असल्याने हे अर्ज रद्दीतच पडून राहण्याची शक्यता आहे. सामान्यांना मात्र आशा लागली आहे.

अर्ज करु नका, अशी कुठलीही योजना नाही!

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदतीची कोणतीही योजना नाही. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करु नये किंवा प्रशासनाकडे तगादा लावू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.