शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शिरपूर पालिका विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:39 IST

स्वच्छ अभियान : देशात ४९ वा क्रमांक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव

शिरपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या उत्तम कामगिरीमुळे नाशिक विभागात शहराने सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाने शहराला संपूर्ण पश्चिम भारतात ३९ वे तर संपूर्ण भारत देशात ४९ वे उत्कृष्ट शहर घोषित केले आहे. ही बाब शहरवासियांच्यादृष्टीने अभिमानाची व भूषणावह असल्याचे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले.१९८५ पासून सर्वांना हेवा वाटावा असे शिरपूर शहर बनविण्याचे प्रयत्न सुरू असून शहरवासीयांचीही त्यास साथ मिळत आहे. स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. विशेषत: शहरातील खुल्या जागांसह नदी-नाले काठ्यावर लाखो वृक्ष लावून शहर हरित करण्यात आले आहे.एखाद्या शहराच्या विकास कल्पनेचे निकष जागतिक स्तरावर सिंगापूरप्रमाणे मानण्यात येतात़ तेथील विकासाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून होत असून त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत़ शहराचा प्रगतीचा आलेख उंचावत असल्याने शहराची लोकसंख्याच नव्हे तर घरसंख्येबरोबर क्षेत्रफळातही लक्षणीय वाढ झाली आहे. शहरवासियांना मिळत असलेल्या नागरी सुविधांमुळे हा लक्षणीय बदल झाला आहे. स्मार्टसिटीचे निकष पूर्ण करणाऱ्या शिरपूर नगरपालिकेस उत्कृष्ट नगरपालिका म्हणून सातत्याने गौरविण्यात येत आहे़ ‘स्मार्ट सिटी’चे निकष पूर्ण करणाºया शिरपूर नगरपालिकेस उत्कृष्ट नगरपालिका म्हणून ‘ब’ वर्गातून ३ कोटी रूपयांचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहे़ तसेच सन २००२ व २००५ मध्ये देखील संत गाडगे महाराज स्वच्छता अभियनात पालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला होता.अद्ययावत नागरी सुविधांमुळे शिरपूर शहराचा विकास सर्वांगाने झाला आहे़ शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज व पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण पूरक योजना आदींमुळे शिरपूरचा सर्वांगीण ‘टेकआॅफ’ झाला आहे़स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर, हरित शिरपूर कायमस्वरूपी राहण्यासाठी स्वच्छतेचा वसा कायमस्वरूपी जपण्याचे आवाहन वेळोवेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे. तसेच सातत्याने व नियमितपणे नगरपरिषदेचे कामकाज आदर्शवत सुरु ठेवले आहे.केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिंमेत दरवर्षी शिरपूर नगर परिषदेने उल्लेखनीय काम केले आहे. या गौरवामुळे पालिकेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला असून नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

टॅग्स :Dhuleधुळे