शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शिरपूर पालिका विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:39 IST

स्वच्छ अभियान : देशात ४९ वा क्रमांक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव

शिरपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या उत्तम कामगिरीमुळे नाशिक विभागात शहराने सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाने शहराला संपूर्ण पश्चिम भारतात ३९ वे तर संपूर्ण भारत देशात ४९ वे उत्कृष्ट शहर घोषित केले आहे. ही बाब शहरवासियांच्यादृष्टीने अभिमानाची व भूषणावह असल्याचे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले.१९८५ पासून सर्वांना हेवा वाटावा असे शिरपूर शहर बनविण्याचे प्रयत्न सुरू असून शहरवासीयांचीही त्यास साथ मिळत आहे. स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. विशेषत: शहरातील खुल्या जागांसह नदी-नाले काठ्यावर लाखो वृक्ष लावून शहर हरित करण्यात आले आहे.एखाद्या शहराच्या विकास कल्पनेचे निकष जागतिक स्तरावर सिंगापूरप्रमाणे मानण्यात येतात़ तेथील विकासाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून होत असून त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत़ शहराचा प्रगतीचा आलेख उंचावत असल्याने शहराची लोकसंख्याच नव्हे तर घरसंख्येबरोबर क्षेत्रफळातही लक्षणीय वाढ झाली आहे. शहरवासियांना मिळत असलेल्या नागरी सुविधांमुळे हा लक्षणीय बदल झाला आहे. स्मार्टसिटीचे निकष पूर्ण करणाऱ्या शिरपूर नगरपालिकेस उत्कृष्ट नगरपालिका म्हणून सातत्याने गौरविण्यात येत आहे़ ‘स्मार्ट सिटी’चे निकष पूर्ण करणाºया शिरपूर नगरपालिकेस उत्कृष्ट नगरपालिका म्हणून ‘ब’ वर्गातून ३ कोटी रूपयांचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहे़ तसेच सन २००२ व २००५ मध्ये देखील संत गाडगे महाराज स्वच्छता अभियनात पालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला होता.अद्ययावत नागरी सुविधांमुळे शिरपूर शहराचा विकास सर्वांगाने झाला आहे़ शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज व पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण पूरक योजना आदींमुळे शिरपूरचा सर्वांगीण ‘टेकआॅफ’ झाला आहे़स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर, हरित शिरपूर कायमस्वरूपी राहण्यासाठी स्वच्छतेचा वसा कायमस्वरूपी जपण्याचे आवाहन वेळोवेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे. तसेच सातत्याने व नियमितपणे नगरपरिषदेचे कामकाज आदर्शवत सुरु ठेवले आहे.केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिंमेत दरवर्षी शिरपूर नगर परिषदेने उल्लेखनीय काम केले आहे. या गौरवामुळे पालिकेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला असून नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

टॅग्स :Dhuleधुळे