शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

वीटभट्टी कामगारांची रणरणत्या उन्हात अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 19:20 IST

कामगार दिनाबाबत अनभिज्ञ असलेल्या या कामगारांच्या श्रमाचा सन्मान कधी होणार?

दीपक पाटील ।कापडणे : सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त असताना येथील महिला व पुरुष कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी तळपत्या उन्हात वीट भट्टीवर विटा तयार करण्याचे, विटा थापण्याचे काम भरदुपारी एक वाजेदरम्यान करताना दिसून येत आहेत. नुकताच १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन पार पडला. हा कामगार दिन जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येतो. जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस जागतिक कामगार दिन व राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जात असतो. मात्र, येथील वीटभट्टी कामगार या दिनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे या कामगारांच्या श्रमाचा सन्मान कोण आणि कधी करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.ग्रामीण कामगार दिशाहीनकापडणेसह संपूर्ण धुळे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून पर्जन्यवृष्टी सतत कमी होत असल्याने ग्रामीण भागात शेती व्यवसायात मजूर व कामगारांच्या हातांना काम नाही. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना शहरी भागात स्थलांतर करावे लागत आहे. तरुण पिढीही आता उच्च तांत्रिक शिक्षण घेत असून त्यांना रोजगार मिळणे काळाची गरज बनली आहे. वाढती लोकसंख्या व महागाईच्या काळात नोकरी, स्वत:चा व्यवसाय असणे हे जगण्याला एक आधार बनले आहे. मात्र, या गोष्टी ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील तरुण रोजगार निर्मितीसाठी शहरांकडे धाव घेत आहे. या मोठया शहरांमध्ये खेडेगावातून गेलेल्या तरूण कामगारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अत्यंत कमी वेतनात जगण्याचा मोठा संघर्ष करावा लागत आहे. कामगारांना या समस्यांपासून वाचविण्यासाठी ग्रामीण भागातच लहान-मोठे उद्योग, रोजगार उपलब्ध होणे काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून शासनाने पाऊल उचलण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे