शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

अखेर खाजगी बसेसचा मध्यप्रदेाात जाण्याचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

महाराष्ट्रासह इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलाव असतांना मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश ...

महाराष्ट्रासह इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलाव असतांना मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे सेंधवा पोलिसांनी सरहद्दीवरील बिजासन घाटातच वाहनांना अडवून ठेवले़. त्यामुळे बिजासन घाटात प्रवासी व वाहन चालक ताटळकत बसून होते. कामगार पुन्हा गावांकडे परतु लागल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी जातांना दिसत आहे़ मात्र खाजगी वाहने व प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात आल्यामुळे वाहनांना जाता येत नाही. मध्यप्रदेश शासनाने अचानक लागू केलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रवाशी वाहतुक करणारे व खाजगी बसेसमधील प्रवाशांची गैरसोय झाली़

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात जसे सरहद्दीवर जाणाऱ्या कामगारांना काही दिवसाकरीता रोखले होते, त्या प्रमाणे स्थिती निर्माण होईल म्हणून मोठ्या संख्येने कामगार गावाकडे परतत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे येथे असलेला मजुर वर्ग उत्तरप्रदेश, बिहारच्या दिशेने जात आहेत़ पण गेल्या १-२ दिवसापासून सरहद्दीवरील बिजासन घाटातच सेंधवा पोलिसांनी त्यांना रोखून ठेवले होते़ . त्यामुळे बिजासन घाटात १५ ते २० बसेस अडकून पडल्या होत्या़

९ रोजी आंदोलनाच्या प्रमुख व ज्येष्ठ समाजसेविका मेघा पाटकर यांना मध्य प्रदेश-महाराष्ट्र सरहद्दीवर प्रवाशांना ताटकळून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर त्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी शिरपूरचे प्रांताधिकारी डॉ़.विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, सांगवी पोलिस ठाण्याचे एपीआय खैरनार यांच्यासह मध्य प्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर रोखण्यात आलेल्या खाजगी बसेस मध्य प्रदेशाकडे रवाना झाल्या. मालमाहू वाहने जात असतांना फक्त लक्झरी बसेसलाच परवानगी नाकारली जात आहे़ ते कामगार मध्य प्रदेशात स्थायिक होण्यासाठी जात नाही तर उत्तर प्रदेश, बिहारकडे जात असतांना देखील त्यांना अडविले जात आहे़. या मजूरांना मध्य प्रदेश शासनाने रोखवायचे होते तर यापूर्वी महाराष्ट्र शासनाला सूचित करणे आवश्यक होते, मात्र तसे देखील कळविले नसल्याचे सांगण्यात आले़.महाराष्ट्र-मध्य प्रदेश शासनाने सरहद्दीवर रोखणाऱ्या मजुरांची निवास व जेवणाची व्यवस्था तरी करावी अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली़.