शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

अखेर खाजगी बसेसचा मध्यप्रदेाात जाण्याचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

महाराष्ट्रासह इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलाव असतांना मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश ...

महाराष्ट्रासह इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलाव असतांना मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे सेंधवा पोलिसांनी सरहद्दीवरील बिजासन घाटातच वाहनांना अडवून ठेवले़. त्यामुळे बिजासन घाटात प्रवासी व वाहन चालक ताटळकत बसून होते. कामगार पुन्हा गावांकडे परतु लागल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी जातांना दिसत आहे़ मात्र खाजगी वाहने व प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात आल्यामुळे वाहनांना जाता येत नाही. मध्यप्रदेश शासनाने अचानक लागू केलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रवाशी वाहतुक करणारे व खाजगी बसेसमधील प्रवाशांची गैरसोय झाली़

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात जसे सरहद्दीवर जाणाऱ्या कामगारांना काही दिवसाकरीता रोखले होते, त्या प्रमाणे स्थिती निर्माण होईल म्हणून मोठ्या संख्येने कामगार गावाकडे परतत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे येथे असलेला मजुर वर्ग उत्तरप्रदेश, बिहारच्या दिशेने जात आहेत़ पण गेल्या १-२ दिवसापासून सरहद्दीवरील बिजासन घाटातच सेंधवा पोलिसांनी त्यांना रोखून ठेवले होते़ . त्यामुळे बिजासन घाटात १५ ते २० बसेस अडकून पडल्या होत्या़

९ रोजी आंदोलनाच्या प्रमुख व ज्येष्ठ समाजसेविका मेघा पाटकर यांना मध्य प्रदेश-महाराष्ट्र सरहद्दीवर प्रवाशांना ताटकळून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर त्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी शिरपूरचे प्रांताधिकारी डॉ़.विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, सांगवी पोलिस ठाण्याचे एपीआय खैरनार यांच्यासह मध्य प्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर रोखण्यात आलेल्या खाजगी बसेस मध्य प्रदेशाकडे रवाना झाल्या. मालमाहू वाहने जात असतांना फक्त लक्झरी बसेसलाच परवानगी नाकारली जात आहे़ ते कामगार मध्य प्रदेशात स्थायिक होण्यासाठी जात नाही तर उत्तर प्रदेश, बिहारकडे जात असतांना देखील त्यांना अडविले जात आहे़. या मजूरांना मध्य प्रदेश शासनाने रोखवायचे होते तर यापूर्वी महाराष्ट्र शासनाला सूचित करणे आवश्यक होते, मात्र तसे देखील कळविले नसल्याचे सांगण्यात आले़.महाराष्ट्र-मध्य प्रदेश शासनाने सरहद्दीवर रोखणाऱ्या मजुरांची निवास व जेवणाची व्यवस्था तरी करावी अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली़.