शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

अखेर खाजगी बसेसचा मध्यप्रदेाात जाण्याचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

महाराष्ट्रासह इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलाव असतांना मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश ...

महाराष्ट्रासह इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलाव असतांना मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे सेंधवा पोलिसांनी सरहद्दीवरील बिजासन घाटातच वाहनांना अडवून ठेवले़. त्यामुळे बिजासन घाटात प्रवासी व वाहन चालक ताटळकत बसून होते. कामगार पुन्हा गावांकडे परतु लागल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी जातांना दिसत आहे़ मात्र खाजगी वाहने व प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात आल्यामुळे वाहनांना जाता येत नाही. मध्यप्रदेश शासनाने अचानक लागू केलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रवाशी वाहतुक करणारे व खाजगी बसेसमधील प्रवाशांची गैरसोय झाली़

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात जसे सरहद्दीवर जाणाऱ्या कामगारांना काही दिवसाकरीता रोखले होते, त्या प्रमाणे स्थिती निर्माण होईल म्हणून मोठ्या संख्येने कामगार गावाकडे परतत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे येथे असलेला मजुर वर्ग उत्तरप्रदेश, बिहारच्या दिशेने जात आहेत़ पण गेल्या १-२ दिवसापासून सरहद्दीवरील बिजासन घाटातच सेंधवा पोलिसांनी त्यांना रोखून ठेवले होते़ . त्यामुळे बिजासन घाटात १५ ते २० बसेस अडकून पडल्या होत्या़

९ रोजी आंदोलनाच्या प्रमुख व ज्येष्ठ समाजसेविका मेघा पाटकर यांना मध्य प्रदेश-महाराष्ट्र सरहद्दीवर प्रवाशांना ताटकळून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर त्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी शिरपूरचे प्रांताधिकारी डॉ़.विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, सांगवी पोलिस ठाण्याचे एपीआय खैरनार यांच्यासह मध्य प्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर रोखण्यात आलेल्या खाजगी बसेस मध्य प्रदेशाकडे रवाना झाल्या. मालमाहू वाहने जात असतांना फक्त लक्झरी बसेसलाच परवानगी नाकारली जात आहे़ ते कामगार मध्य प्रदेशात स्थायिक होण्यासाठी जात नाही तर उत्तर प्रदेश, बिहारकडे जात असतांना देखील त्यांना अडविले जात आहे़. या मजूरांना मध्य प्रदेश शासनाने रोखवायचे होते तर यापूर्वी महाराष्ट्र शासनाला सूचित करणे आवश्यक होते, मात्र तसे देखील कळविले नसल्याचे सांगण्यात आले़.महाराष्ट्र-मध्य प्रदेश शासनाने सरहद्दीवर रोखणाऱ्या मजुरांची निवास व जेवणाची व्यवस्था तरी करावी अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली़.