शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

अखेर अमरावती धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:54 IST

मालपूर  : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणी सोडण्याचा घेतला निर्णय

मालपूर : अमरावती मध्यम प्रकल्पाच्या  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने, धरणातील जलसाठ्यात वाढ होणार असल्याने, या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले. अमरावती धरण शंभर टक्के भरल्याशिवाय एक थेंब देखील पाणी सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकºयांनी सोमवारी अमरावती धरणाच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन करीत पाणी सोडण्यास विरोध केला होता.  दरम्यान अमरावती प्रकल्पातील जलसाठ्यात जलदगतीने वाढ होत असल्याने, पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता प्रशांत खैरनार, उपअभियंता जी.एम. शेख यांनी मंगळवारी सकाळी प्रकल्पावर येऊन पहाणी केली. सकाळी ९ वाजेपर्यंत या प्रकल्पात २२५.१५ मीटर जलसाठा होता.  शासन निर्णयानुसार तो साठा  १० सप्टेंबरपर्यंत २२४.४५ एवढाच ठेवावा लागणार आहे. शिवाय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने आणखी जलसाठ्यात वाढ होणार असल्याचे गांभीर्य ओळखून या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून १५ से.मी.ने दरवाजे वर करून पाणी सोडण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, विखरणचे सरपंच महेंद्र पवार, उपसरपंच उमेश पाटील, मालपूरचे ग्रा.प. सदस्य अरूण धनगर, बापू शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी, भूषण रावल, पोलीस पाटील बापू बागूल, जगदीश खंडेराय, सुरेश पाटील, मगन चौधरी, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे