शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

‘शिसाका’चा ताबा अखेर संचालक मंडळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:27 IST

डीआरटी कोर्टाचे आदेश : जिल्हा बॅँकेमार्फत त्यानुसार कार्यवाही

शिरपूर : शिरपूर साखर कारखान्याचा ताबा धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेतर्फे अखेर शुक्रवारी संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला. तत्पूर्वी बॅँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संचालकांनी चार तास कारखान्याच्या सद्यस्थितीची संयुक्तपणे पाहणी केली.यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, डीआरडी कोर्टाचे श्रीकांत कोंडो, कारखान्याचे इंजिनिअर सी़झेड़ मराठे, चेअरमन माधव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, ज्ञानेश्वर पाटील, के़डी़पाटील, वासुदेव देवरे, भरत पाटील, संग्रामसिंग राजपूत, शाम करंकाळ, राहुल रंधे, डिगंबर माळी, ठाणसिंग पाटील, अ‍ॅडग़ोपाल राजपूत, मोहन पाटील, अ‍ॅड़पी़पी़ ऐंडाईत, सुरेश पाटील, दरबारसिंग जमादार आदी उपस्थित होते़ जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी यावेळी बॅँकेच्या ताब्यात असलेला कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिल्याचे जाहीर केले़२६ कोटी रुपयांच्या थकीत कर्जामुळे जिल्हा बँकेने २०१२ मध्ये शिसाकाची मालमत्ता जप्त केली होती़ या कारवाईस तत्कालीन संचालक मंडळातर्फे औरंगाबाद कर्जवसुली प्राधिकरणाकडे आव्हान देण्यात आले प्राधिकरणाने ही कारवाई अवैध ठरविली होती़ त्यामुळे बँकेने जप्त मालमत्ता शिसाकाकडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी घेण्यात आला नाही़ दरम्यान, जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा देण्यासाठी कर्जवसुली प्राधिकरण न्यायालयात दाद मागितल्यानंतर तो ताब्यात देण्याची सूचना केली. त्यामुळे संचालक मंडळ कारखान्याच्या ताबा घेण्यास तयार झाले.लवकरच बैठकीत दिशा ठरविणार कारखान्याचा ताबा मिळाल्याने आता लवकरच संचालक मंडळाची बैठक घेवून पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे चेअरमन माधव पाटील यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.दरम्यान कारखान्याचा ताबा मिळाल्याने शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठा हुरूप निर्माण झाला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे