शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

दर घसरण्याच्या भीतीने मालपूर परिसरात कांदा काढणीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:31 IST

हमीभावापेक्षा कमी भाव नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात कांदा ४० ते ...

हमीभावापेक्षा कमी भाव नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री होत होता. मात्र अचानक या आठवड्यात निम्म्यावर म्हणजे २०-२१ रुपयांवर आला. अजून भाव घसरून कवडीमोल भावाने कांदा विक्री करावा लागू नये म्हणून येथील शेतकर्‍यांनी हे पीक काढायला सुरुवात केली आहे. अन्यथा अजून कांदा पूर्ण तयार व्हायला एक महिन्याचा कालावधी लागला असता. यामुळे वजनात घट येणार यासाठी शेतकरी हा कुठेना कुठे नाडलाच जात असल्यामुळे कुठे गेला तुमचा हमीभाव, अशी विचारणा करताना दिसून येत आहे.

दोन हजार रुपये क्विंटल गहूदेखील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या १५००-१६०० क्विंटलने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरादारात उत्पादन आले की भावात घसरण ही नित्याची बाब झाली आहे. यामुळे हमीभावापेक्षा कमी भाव नको, याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या घरादारात उत्पादन आले की भावात घसरण ही आमच्या नशिबाचा भाग आहे. ४० रुपयांचा कांदा २० रुपये झाला. तो पाच रुपये किलोने विकावा लागू नये म्हणून आज तयार होण्याच्या अगोदर इच्छा नसताना काढावा लागला. कुठे गेला तुमचा हमीभाव. यामुळे शेती तोट्याची ठरत आहे, अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी वामन माळी यांनी व्यक्त केली आहे.