शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
4
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
5
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
6
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
8
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
9
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
10
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
11
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
12
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
13
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
14
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
15
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
16
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
17
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
18
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
19
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
20
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मिलीमीटर एवढे आहे. जिल्ह्यात ४ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी ...

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मिलीमीटर एवढे आहे. जिल्ह्यात ४ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते. मात्र गेल्या दोन वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे बागायती पिके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वात जास्त कल असतो. जिल्ह्यात गेल्या सात वर्षात कापूस लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झालेली दिसून येते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८८ हजार हेक्टर ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. तर १६-१७ या वर्षात ७५०० हेक्टरने वाढ होत १ लाख ९६ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली. त्यानंतर १७-१८ या वर्षात ९४०० हेक्टरने वाढ होत २ लाख ५ हजार ३८३ हेक्टरपर्यंत लागवड करण्यात आली. २०१८-१९ मध्ये २ लाख ३२ हजार ७००, २०१९-२० मध्ये २ लाख २४ हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली होती. दरम्यान २०२०-२१ मध्ये तब्बल १५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात वाढ होत, २ लाख ४० हजार २०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली होती. ही आतापर्यंत सर्वात जास्त कपाशीची लागवड असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०२१-२२ मध्ये २ लाख २३ हजारचे उद्दिष्ट

यावर्षीही शेतकऱ्यांचे कापूस लागवडीलाच प्राधान्य असून, कृषी विभागातर्फे २ लाख २३ हजाराचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे. दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत असल्याने, कपाशीचे क्षेत्र वाढत चालले आहे.

भाताची लागवड कमी

धुळे जिल्ह्यातील माळमाथा परिसरात भाताची लागवड करण्यात येत असते. दोन वर्षात दमदार पाऊस झाल्याने,भाताची लागवडीत वाढ होणे अपेक्षित होते. मात्र २०१९-२० मध्ये ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. तर २०२०-२१ मध्ये २२०० हेक्टरने भाताचे क्षेत्र कमी होत ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरच भाताची लागवड झालेली होती. तर २०२१-२२ मध्ये अजून १०० हेक्टर क्षेत्र कमी झालेले असून, यावर्षी फक्त ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

गेल्या काही वर्षात कापसाची अनेक वाण विकसित झालेले आहेत. त्यामुळे एकरी उत्पादन वाढले आहे. तसेच आपल्याकडील जमीनही कपाशी पिकाला पोषक आहे. कापूस विक्रीतून चांगली रक्कम शेतकऱ्याला मिळत असते. आदी गोष्टींमुळे जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढत आहेत.

- डॉ. दिनेश नांद्रे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी केंद्र,धुळे

गेल्या काही वर्षात कपाशीवर पडलेल्या रोगराईमुळे कापूस लागवड परवडत नाही. मात्र इतर पिके खर्चाच्या मानाने परवडत नाही. कोरडवाहू क्षेत्रातही कापसाचे चांगले उत्पन्न येते. कापूस विक्रीतून एकठोक रक्कम मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्याय उपलब्ध नसल्याने, कपाशीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे.

- ॲड. प्रकाश पाटील,

कृषिभूषण,पढावद