शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मिलीमीटर एवढे आहे. जिल्ह्यात ४ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी ...

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मिलीमीटर एवढे आहे. जिल्ह्यात ४ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते. मात्र गेल्या दोन वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे बागायती पिके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वात जास्त कल असतो. जिल्ह्यात गेल्या सात वर्षात कापूस लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झालेली दिसून येते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८८ हजार हेक्टर ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. तर १६-१७ या वर्षात ७५०० हेक्टरने वाढ होत १ लाख ९६ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली. त्यानंतर १७-१८ या वर्षात ९४०० हेक्टरने वाढ होत २ लाख ५ हजार ३८३ हेक्टरपर्यंत लागवड करण्यात आली. २०१८-१९ मध्ये २ लाख ३२ हजार ७००, २०१९-२० मध्ये २ लाख २४ हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली होती. दरम्यान २०२०-२१ मध्ये तब्बल १५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात वाढ होत, २ लाख ४० हजार २०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली होती. ही आतापर्यंत सर्वात जास्त कपाशीची लागवड असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०२१-२२ मध्ये २ लाख २३ हजारचे उद्दिष्ट

यावर्षीही शेतकऱ्यांचे कापूस लागवडीलाच प्राधान्य असून, कृषी विभागातर्फे २ लाख २३ हजाराचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे. दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत असल्याने, कपाशीचे क्षेत्र वाढत चालले आहे.

भाताची लागवड कमी

धुळे जिल्ह्यातील माळमाथा परिसरात भाताची लागवड करण्यात येत असते. दोन वर्षात दमदार पाऊस झाल्याने,भाताची लागवडीत वाढ होणे अपेक्षित होते. मात्र २०१९-२० मध्ये ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. तर २०२०-२१ मध्ये २२०० हेक्टरने भाताचे क्षेत्र कमी होत ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरच भाताची लागवड झालेली होती. तर २०२१-२२ मध्ये अजून १०० हेक्टर क्षेत्र कमी झालेले असून, यावर्षी फक्त ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

गेल्या काही वर्षात कापसाची अनेक वाण विकसित झालेले आहेत. त्यामुळे एकरी उत्पादन वाढले आहे. तसेच आपल्याकडील जमीनही कपाशी पिकाला पोषक आहे. कापूस विक्रीतून चांगली रक्कम शेतकऱ्याला मिळत असते. आदी गोष्टींमुळे जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढत आहेत.

- डॉ. दिनेश नांद्रे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी केंद्र,धुळे

गेल्या काही वर्षात कपाशीवर पडलेल्या रोगराईमुळे कापूस लागवड परवडत नाही. मात्र इतर पिके खर्चाच्या मानाने परवडत नाही. कोरडवाहू क्षेत्रातही कापसाचे चांगले उत्पन्न येते. कापूस विक्रीतून एकठोक रक्कम मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्याय उपलब्ध नसल्याने, कपाशीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे.

- ॲड. प्रकाश पाटील,

कृषिभूषण,पढावद