शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

सिंचन भवनात शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:43 IST

कनोली पाटचारीतून पाणी सोडा : आत्मदहनासाठी आणले इंधन, गळफाससाठी बांधला दोर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कनोली पाटचारी क्रमांक तीनमधून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मंगळवारी धुळे तालुक्यातील तरवाडे, नाणे, विंचूर येथील बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचन भवनात येवून टोकाची भूमिका घेतल्याने अधिकारी, कर्मचाºयांची तारांबळ उडाली़कनोली पाटचारीतून येणाºया पाण्याच्या भरवशावर येथील शेतकºयांनी रब्बी पिकांची पेरणी केली़ परंतु पाटचारी दुरूस्तीच्या नावाखाली सिंचन विभागाने पाणी सोडले नाही़ त्यामुळे पिके करपून लागली असून नुकसान होत आहे़ या पाटचारीतून त्वरीत पाण्याचे आवर्तन सोडावे अशी वेळावेळी मागणी करण्यात आली़ परंतु सिंचनच्या अभियंत्यांनी दखल घेतली नाही़ त्यामुळे कंटाळलेल्या शेतकºयांनी मंगळवारी सिंचन भवन गाठले़ यावेळी शेतकºयांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यासाठी सोबत इंधनाचा कॅन आणला होता़ तसेच कार्यालयाच्या छताला गळफास घेण्यासाठी दोर बांधला आणि कार्यालयातच आत्महत्या करण्याचा ईशारा दिला़ त्यामुळे सिंचन भवनातील कर्मचाºयांची एकच तारांबळ उडाली़ धक्कादायक बाब म्हणजे जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते़ तब्बल तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर कार्यकारी अभियंत्यांनी शेतकºयांचे म्हणणे ऐकून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले़ त्यावेळी शेतकरी परतले़ शेतकºयांनी निवेदन दिले असून त्यावर शिवाजी माळी, ज्ञानेश्वर माळी, आनंदसिंग देवरे, शानाभाऊ राजपूत, रवींद्र पाटील, गुलाब पाटील, भटू पाटील, दगडू माळी, राकेश वाघ, संतोष राजपूत, बापू माळी, दिलीप राजपूत, विजय पाटील, सुभाष वाघ, पुरूषोत्तम देवरे यांच्यासह ३३ शेतकºयांच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे