शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

शेतकरी ओढतात बैलगाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 22:45 IST

निमगुळ येथे कसरत : पुलावरून वाहणारे पाणी, शेवाळ धोकेदायक

विंचूर - धुळे तालुक्यातील निमगुळ येथील शेतकरी बैलांऐवजी स्वत: नदीपात्रातून शेतमालाने भरलेली गाडी ओढतात. अशी ही कसरत त्यांना रोजच करावी लागत आहे. कारण नदीला सध्या गुडघाभर पाणी वाहत असून पूल शेवाळलेला आहे. बैल गाडीला जुंपल्यास खूर घसरून त्यांचा पाय मोडण्याची भीती असते. अशा घटना घडून तीन गुरे दगावल्याने अशा पद्धतीने गाडी नेऊन शेतमालाची वाहतूक केली जात आहे.नदी पात्र ओलांडून मग पुन्हा गाडीला बैल जुंपून शेताकडे जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यंदा जास्त पाऊस झाल्याने निमगुळ गावाच्या बोरी नदीवरील फरशी पुलावर नियमित गुडघ्याच्यावर पाणी वाहत आहे. तसेच पाऊस झाल्यास नदी अचानक दुथडी भरून वाहते. फरशीपूल मोठ्या प्रमाणात शेवाळल्याने निसरडा झाला आहे. मध्य भागी मोठा खड्डाही पडला असून तो माणसांना नीट जाणवतो मात्र गुरांच्या लक्षात येत नसल्याने अनेकदा पाय मुरगळून बैल व अन्य गुरे खाली पाण्यात पडल्याचा अनुभव शेतकरी सांगतात.फरशीच्या वरील बाजुस वाळू साचली आहे. ५०० फूट लांबीच्या फरशी पुलास केवळ ८ पाईप असून ते कचरा, वाळू साचल्याने बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी पुलावरून वाहते. निमगुळ गावची ४० टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या नदीच्या पलीकडे राहते. दोघांची शेतजमिनी अलीकडे-पलीकडे आहेत सुमारे ७०० हेक्टर जमीन नदीच्या उजव्या तिरावर आहे. ते शेतकरी सध्या पावसाने खराब झालेली पिके व कापूस आवरण्यासाठी धडपड करत आहेत. नदी सुरक्षित पार करण्यासाठी जाणकारांनी दोरखंडही बांधला. मात्र गाडी व इतर जनावरे शेताकडे नेतांना जीवघेणी कसरत गेल्या तीन महिन्यांपासून करावी लागते. तरूण पैलवान मदत करतात. महिलांना देखील गाडीवर बसवून नदी ओलांडावी लागते. सर्व बैलगाडी धारकांना शेतात जाताना गाडी ओढण्याचा त्रास होतो. प्रचंड शक्ती एकवटून सदर कापुस व खराब झालेले भुईमूग मका आदी पिके गाडीवर आणणे गरजेचे असल्याने सध्या तरी दुसरा पर्याय नसल्याचे निमगुळच्या ग्रामस्थांनी सांगितले.उंच पुलाची मागणी अद्याप प्र्रलंबितसध्या येथील छोट्या फरशी पुलावरून गुडघाभर पाणी वाहत असून जीवघेणी खड्डे असल्याने तेथील लहू मराठे, भिकन चव्हाण व पैलवान सतीष मोरे हे व अजून काही शेतकरी जीवाची बाजी लावून नदीतून गाडी मेहनतीने ओढतात. त्याशिवाय शेतातून माल आणणे अनेकांना शक्यच नाही. सदर ठिकाणी ऊंच पुल बाधण्याची मागणी नागरिकांनी आधीच केलीय परिसरातील शेतक?्यांची कापूस वेचणी सूरू असता अशी फरफट होत आहे पावसाने आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन शेतकऱ्यांची या संकटातून लवकर सुटका करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे